माणूस जातो तो कायमचाच..!
माणूस जातो तो कायमचाच..! (डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील) माणूस गेल्याची बातमी येते... आधी लोक ‘एक्साईट’ होतात... मग लोकांना वाईट वाटते... लोक बातमी ‘व्हायरल’ करतात... लोक येतात... रडतात... अश्रू ढाळतात... गळे काढतात... लोक श्रद्धांजली वाहतात... स्टेटस ठेवतात... व्हिडिओ बनवितात... शेअर करतात... लोक भाषणे करतात... ‘गेलेल्याची पोकळी भरून निघणार नाही’ म्हणतात... ‘असा माणूस पुन्हा होणे नाही’ म्हणतात... लोक कालपर्यंत ज्याला पाण्यात पाहत होते, त्याचेच त्याच्या मृत्यूनंतर कौतुक करतात... कोणी मनःपूर्वक, तर कोणी ‘मरणान्तानि वैराणि’ म्हणून कौतुक करतात... अनुयायी ‘आमचे दादा, मामा, काका, आबा, आण्णा, आप्पा, वहिनी, ताई, दीदी, काकी आणि कोण-कोण गेले’ म्हणत राहतात... काहीजण ‘तुमच्यामुळेच आम्ही होतो’ म्हणतात... काहीजण ‘तुमच्यानंतर आमचे कसे होणार?’ म्हणतात... सहकारी त्यांच्याबरोबरच्या कामाचा अनुभव सांगतात... विरोधकही वेगळ्या चष्म्यातून (विरोधकाच्या भूमिकेतून) तेच सांगतात... समर्थक कौतुकाचा वर्षाव करतात... काही मूठभर द्वेष करणारे अप्रत्यक्षपणे ‘बरे झाले, गेले एकदाचे’ म्हणत तीच द्वेषमूलक भूमिका टोकाला घेऊन जा...


