पश्चिम घाटातील सापांची घटती संख्या पर्यावरणाच्या दृष्टीने चिंताजनक! (The dwindling population of snakes in the Western Ghats is alarming from an environmental perspective!)
अमर्याद जंगलतोड, अनियंत्रित मॉन्सून आणि बेशिस्त रस्ते वाहतूक सापांच्या मुळावर! (© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील) विषय ओळख- जीवसृष्टीतील अन्नसाखळ्या अबाधित राहणे ही निसर्गसंवर्धनाच्या दृष्टीने अत्यावश्यक अशी बाब आहे. सध्या सर्वच सजीव सृष्टीवर, विशेषतः प्राणी जगतावर अन्नसाखळ्या बाधित झाल्यामुळे मोठे संकट ओढावत चालले आहे. रस्ते, मोठमोठ्या फॅक्टऱ्या, कॉर्पोरेट कार्यालयांच्या इमारती या स्वरुपात पायाभूत सुविधांचा विकास करण्याच्या नादात प्राण्यांचे अधिवास धोक्यात येऊ लागले आहेत . पोटापाण्यासाठी माणसे जंगलात आणि जंगली प्राणी रहिवासी क्षेत्रात अतिक्रमण करत आहेत. जागतिक दर्जाचे आघाडीचे दैनिक ‘द गार्डियन’ने सापांच्या घटत्या संख्येबद्दल सुमारे १५ वर्षांपूर्वीच एक मोठा अग्रलेख लिहून जगाला या संभाव्य संकटाची जाणीव करून दिली होती! माझे निरीक्षण- मी जवळपास २०१३-१४ पासून सापांचा अभ्यास करीत आहे . पश्चिम घाटांच्या मध्यभागाचा एक भाग असणाऱ्या राधानगरी-दाजीपूर-गगनबावडा या जंगलपट्ट्यातील सापांचा अभ्यास करून त्यांच्या प्रजातींच्या नोंदी ठेवण्याचा वैयक्तिक प्रयत्न मी करत असतो. सापांची संख्या मोजणे ...