आंतरराष्ट्रीय शांतता दिन (२१ सप्टेंबर)- International Day of Peace (21 September)
©2016, Dr. Amit Tukaram Patil:
▶▶▶२१ सप्टेंबर- आंतरराष्ट्रीय शांतता दिन◀◀◀
(©२०१६,डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील,
वैद्यकीय अधिकारी गट 'अ',
प्राथमिक आरोग्य केंद्र भाताणे, जि. पालघर.)
(प्रस्तुत लेखक मान. श्री. आर. आर. (आबा) पाटील, माजी उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे सख्खे भाचेे आहेत.)
🕊🕊🕊🕊🕊🕊🕊🕊🕊🕊🕊
आज साजरा होत असलेल्या आंतरराष्ट्रीय शांतता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
▶दरवर्षी २१ सप्टेंबर हा दिवस संयुक्त राष्ट्रातर्फे आंतरराष्ट्रीय शांतता दिन म्हणून साजरा केला जातो.
Sustainable Development Goals: Building Blocks for Peace (शाश्वत विकास ध्येये: शांततेचा पाया) हे २०१६ या वर्षीचे या दिनाचे बोधवाक्य आहे.
▶आजचाच दिवस आंतरराष्ट्रीय वैयक्तिक व अांतर्देशीय शस्त्रसंधी दिवस म्हणून पाळला जातो.
▶बऱ्याच धर्मांमध्ये शांततेचे प्रतीक समजले जाणारे ऑलिव्हची पाने तोडात धरलेले पांढरे कबूतर हे या दिनाचे व एकूणच शांततेचे बोधचिन्ह ठरविले गेले आहे.
▶अल्बर्ट आईनस्टाईनने म्हटले आहे की,"बळाचा वापर करून शांतता प्रस्थापित करता येत नाही. ती केवळ सामंजस्यातूनच मिळविता येते." (Peace cannot be kept by force. It can only be achieved by understanding.)
दुर्दैवाने या महान व्यक्तीने सुचविलेल्या मार्गाच्या अगदी विपरीत मार्गाने आज जगभर शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. भारताचा काश्मीर प्रश्न असो की पाकिस्तानचा बलुचिस्तान प्रश्न असो, सीरियातील अंतर्गत बंडाळीची समस्या असो की उत्तर कोरियाच्या अण्वस्त्र चाचणीचा प्रश्न...सर्वत्रच छुप्या किंवा उघड लष्करी बळाचा वापर करूनच हे प्रश्न सोडविण्याचा (की, खरे तर नवीनच प्रश्न तयार करण्याचा) यांतून प्रयत्न केला जातो.
पाकिस्तानसारख्या दहशतवादी राष्ट्रालाही त्याचा तत्कालिक निषेध करण्याव्यतिरिक्त काहीच न करता केवळ त्याच्या भूराजकीय स्थानाचा विचार करून बड्या राष्ट्रांकडून शस्त्रास्त्र निर्मितीत सहकार्य केले जाते.
बड्या राष्ट्रांच्या वैयक्तिक स्वार्थ साधण्याच्या प्रवृत्तीमुळे जगाचे विविध कारणांसाठी लढणाऱ्या गटांत त्यांनी विभाजन केले आहे. सर्वांनी एकमेकांच्या हातात हात देऊन अखिल मानवजातीचा विकास साधण्याएेवजी हे देश एकमेकांच्या पायात पाय घालून दुसरे मागे राहून केवळ स्वतःचीच प्रगती कशी होईल याचा विचार करतात.
अशा प्रकारे सातत्याने युद्धजन्य परिस्थितीची टांगती तलवार डोक्यावर असताना जग शांततेत नांदणे केवळ अशक्य आहे.
(©२०१६,डॉ.अमित सुमन तुकाराम पाटील
सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित)
Dr. Amit Suman Tukaram Patil:
▶▶▶ केवळ लष्करी गैरवापरामुळेच अशांतता पसरते असे मानणे पूर्णतः चुकीचे आहे. सध्या कर्नाटक-तामिळनाडूमध्ये कावेरी नदीच्या पाणीवाटपाबद्दलच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे चालू असलेली दंगल ही भौगोलिक व पर्यावरणीय बाबींच्या असमतोलामुळे निर्माण झालेल्या किंवा होऊ शकणाऱ्या मोठ्या अशांततेची प्रतीक आहे. आईनस्टाईनने म्हटल्याप्रमाणे न्यायालयीन किंवा पोलिसी बळाचा वापर करून असे प्रश्न सुटत नसतात हे या प्रकरणातून स्पष्टपणे जाणवते.
▶दुष्काळासारखी पर्यावरणीय व नैसर्गिक आपत्तीही मानवाची शांत झोप उडवू शकते, असा बोध ह्या घटनेतून घेतला जावा. त्यामुळे अगदी झाडे लावण्यापासून ते प्लॅस्टिकचा वापर टाळण्यापर्यंतच्या कृती अंमलात आणून आपण अखंड मानवजातीला शांततेच्या दिशेने वळवू शकतो ही येथे लक्षात घेण्याजोगी बाब आहे.
© Dr. Amit Suman Tukaram Patil:
▶सध्या पालघर जिल्ह्यातील जव्हार व मोखाडा भागात कुपोषणाने होत असलेले बालमृत्यू गाजत आहेत. अगदी आदिवासी विकास मंत्र्यांनी बालमृत्यू झालेल्या घरांना भेटी देण्याचा प्रयत्न केला असता तेथे काम करणाऱ्या काही संघटना व स्थानिक जनतेने त्यांना विरोध केला. वस्तुतः या मंत्रिमहोदयांच्या वैयक्तिक चुका किंवा उणिवांमुळे निर्माण झालेला हा प्रश्न नव्हे; पण शिक्षण व आरोग्य सेवांचा स्वतःच्या विकासासाठी आजही हे आदिवासी बांधव उपयोग करू शकले नाहीएत हे कटू असले तरी सत्य आहे. अशा वेळी या देशाचे नागरिक व आपले देशबांधव म्हणून या लोकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे ही आपली व शासनाची मुख्य जबाबदारी आहे.
▶सर्वसमावेशक शिक्षणाचा व आरोग्य सुविधांचा अभाव किंवा या सुविधा सामान्य जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी कमी पडत असलेले आपले व लोकनियुक्त शासनाचे प्रयत्न हे अशा प्रकारे मानवी अशांततेचे कारण ठरू शकतात हे यातून सूचित होते.
©2016,Dr. Amit Suman Tukaram Patil:
▶प्रादेशिक व भाषिक अस्मितेच्या प्रश्नांचा योग्य विचार न करता मोठ्या जनसमुदायाला न पटणारे काही निर्णय घेतले तर संयुक्त महाराष्ट्राच्या किंवा आंध्र-तेलंगणाच्या प्रश्नासारखा जटील प्रश्न निर्माण होऊ शकतो याला इतिहास साक्षीदार आहे. त्यामुळे अन्न, वस्त्र, निवारा व सुरक्षितता यांबरोबरच भाषिक व प्रादेशिक अस्मितांची जपवणूक हीही गोष्ट मानवी शांततेसाठी तितकीच गरजेची असते हे यातून सिद्ध होते. प्रत्येक व्यक्ती, व्यक्तिसमूह व समाजाला स्वतःचा स्वाभिमान जपण्याचा व त्यासाठी योग्य ते प्रयत्न करण्याचा अधिकार दिला गेला पाहिजे. ही एक अशी गोष्ट आहे की ज्यामुळे जनसमूहाची सांस्कृतिक भूक भागली जाऊन व्यापक मानवी शांतता प्रस्थापित होण्याच्या कामात मदत होते.
©2016,Dr. Amit Suman Tukaram Patil:
▶वरील गोष्टींबरोबरच वांशिक व धार्मिक स्वातंत्र्य व अस्मिता जोपासण्याचा अधिकार असणेही मानवी शांततेच्या दृष्टीने आवश्यक गोष्ट आहे. हिटलरने केलेल्या ज्यू लोकांच्या कत्तली व पिळवणूक हे वांशिक अस्मितेच्या दमनाचे एेतिहासिक उदाहरण आहे. या भूतकाळातील घटनांतून ज्यू समुदाय अद्यापही सावरला नसल्यासारखे वाटते. सीरियातील वांशिक दंगली, शिया-सुन्नी पंथांत होणारी भांडणे याबरोबरच इस्राइल-पॅलेस्टाइनमधील प्रश्नही प्रामुख्याने वांशिक कारणांमुळेच उद्भवला आहे. यामुळे मध्य-पूर्व आशियात सततचीच अशांतता असते. मानवी प्रगतीच्या व शांततामय मार्गाने जीवन व्यतीत करण्याच्या प्रयत्नांत या गोष्टींमुळे अडथळा निर्माण झाला आहे.
© 2016,Dr. Amit Suman Tukaram Patil: (©२०१६,डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील,
वैद्यकीय अधिकारी गट 'अ',
प्राथमिक आरोग्य केंद्र भाताणे, जि. पालघर.)
(प्रस्तुत लेखक मान. श्री. आर. आर. (आबा) पाटील, माजी उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे सख्खे भाचेे आहेत.)
▶▶▶उपाय काय?
▶वर उल्लेख केलेल्या उदाहरणांमध्ये विविध प्रकारे निर्माण होणाऱ्या मानवी समुदायामधील अशांततेची जी कारणे सांगितली आहेत ती चर्चा व सामंजस्याने नष्ट करणे हाच शाश्वत शांतता प्रस्थापित करण्याचा एकमेव मार्ग आहे.
कोणत्याही ठोस कृतीशिवाय केवळ वर-वर बोलून किंवा मनापासून प्रयत्न न करून असे प्रश्न सुटू शकत नाहीत.
अशांतता छोट्या छोट्या कारणांमुळे नक्कीच पसरत नाही, त्यामुळे उपस्थित झालेले प्रश्न जटील आहेत व त्यामुळे ते सोडविणे कठीण आहे असे म्हणणे ही लंगडी सबब आहे. प्रश्न अशा पद्धतीने सोडविले जाणे गरजेचे आहे ज्यामध्ये मुख्य समस्या अगदी मुळापासून चर्चिली जाऊन सोडविली गेली पाहिजे व काढण्यात आलेला तोडगा बहुसंख्येने दोन्ही बाजूंना मान्य झाला पाहिजे.
▶बळाचा वापर करून असे उपाय मानवसमूहाच्या गळी उतरवणे शक्य नसते, हे इतिहासाने वारंवार सिद्ध केले आहे.
मुळात एका मोठ्या जनसमूहाचा प्रश्न म्हणून त्याकडे संबंधितांनी सह-अनुभूतीने (empathy) व मान्यतेनच्या भावनेने (sympathy) पाहिले पाहिजे.
▶प्रश्न सोडविताना आपण कोणावर तरी उपकार करतोय अशी भावना उपाय शोधणाऱ्यांच्या ठायी असणे उपयोगाचे नाही. अखिल मानवजातीच्या वैश्विक शांतता व स्थिरतेसाठी उपायकर्त्यांकडून प्रयत्न होणे अपेक्षित अाहे.
▶बऱ्याच समस्या वर्षानुवर्षे सुटत नाहीत याचे मुख्य कारण एकतर त्या व्यक्तिसमूहाचा किंवा राज्य-देशाचा अहंकार हे असते (उदा. महाराष्ट्र- कर्नाटक सीमाप्रश्न किंवा भारत-पाकिस्तान प्रश्न) अथवा त्या प्रश्नाकडे व्यापक नजरेतून न बघता वैयक्तिक किंवा संकुचित भावनेने बघणे हेही असू शकते. मोठे प्रश्न सोडविताना सामूहिक जनभावनेचा विचार होणे आत्यंतिक गरजेचे आहे असे प्रस्तुत लेखकाला वाटते.
▶एखाद्या समाजघटकाकडे पूर्वग्रहदूषित नजरेने (उदा. सध्या गाजत असलेले मराठा समाजाचे मोर्चे) किंवा तिरस्कृतपणे (उदा. हिटलरचा ज्यू धर्माबाबतचा दृष्टिकोन) बघणे हे अशा समस्या न सुटण्यामागचे आणखी एक महत्त्वाचे कारण आहे. समस्या सोडविण्यापूर्वी असे दृष्टिकोन बदलून त्या समस्यांकडे तटस्थपणे (impartially) व त्रयस्थपणे (as a third party) पाहणे गरजेचे आहे.
▶एखाद्या उपायकर्त्याची संबंधित प्रश्नात भावनिक गुंतवणूक (emotional attachment) नसणेही खूप आवश्यक आहे.
⏩महात्मा गांधीजींचे एक वाक्य मला खूप आवडते. ते एके ठिकाणी म्हणाले होते, "an eye for an eye only ends up making the whole world blind." (डोळ्याला डोळे भिडवले तर सगळं जगच आंधळं होईल.) हा विचार जितका सुंदर आहे तितकाच त्यामागील गर्भितार्थही!
▶मला वाटते, डोळ्यांना डोळे भिडविण्यापेक्षा खांद्याला खांदा लावून काम केले तर जास्त फायदा होईल.
त्याचप्रमाणे वर्षानुवर्षे चालत आलेली एखादी समस्या एखाद्या प्रभावी व्यक्तीच्या किंवा व्यक्तिगटाच्या किंवा मोठ्या प्रमाणावरील बहुमताने निवडून आलेल्या सरकारच्या उदयामुळे चुटकीसरशी सुटतील अशी अपेक्षा करणे हे केवळ भाबडेपणाचेच नव्हे तर सत्य परिस्थितीच्या विपरीत ठरेल. अशा समस्या सोडविण्यासाठी पूरेपूर वेळ देऊन सर्वमान्य ठरेल असा तोडगा (golden mean) काढला तर दीर्घकाळ अस्वस्थता (unrest) दूर करून शांतता प्रस्थापनेच्या कामात मोलाची मदत होऊन त्या प्रश्नाच्या समाधानकारक उकलीमागील तो एक मैलाचा दगड ठरेल.
© Dr. Amit Suman Tukaram Patil: (©२०१६,डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील,
वैद्यकीय अधिकारी गट 'अ',
प्राथमिक आरोग्य केंद्र भाताणे, जि. पालघर.)
(प्रस्तुत लेखक मान. श्री. आर. आर. (आबा) पाटील, माजी उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे सख्खे भाचेे आहेत.)
▶▶▶बाह्य शांततेचे झाले; पण माझ्या आंतरिक शांततेचे काय?
▶'सर सलामत तो पगडी पचास' अशी एक म्हण आहे. जागतिक प्रश्न वगैरे ठीक आहेत; पण माझ्या अस्थिर, चंचल आणि अस्वस्थ मनाचे काय असा प्रश्न (माझ्यासह) बऱ्याच जणांना बऱ्याच वेळा पडतो, त्याचे काय करायचे असे तुम्ही मला विचाराल. प्रश्न एकदम रास्त आहे; पण खूप अवघड नाही.
⏩गौतम बुद्धांनी अगदी एका वाक्यात याचे उत्तर दिले आहे,"Peace comes from within. Do not seek it without." (शांतता ही मनाच्या आतून येते, तिचा शोध बाहेरच्या जगात घेऊ नका.)
▶एक गोष्ट सूर्यप्रकाशाइतकी स्वच्छ आणि स्पष्ट आहे की, तुमच्या परवानगीशिवाय कोणी तुमचे मन अस्वस्थ व म्हणून अशांत करू शकत नाही...तुमच्या परवानगीशिवाय कोणी तुमचा पराभव करू शकत नाही!
▶आपल्या मानसिक अशांततेचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे आपण स्वतःचा आहे तसा स्वीकार करीत नाही व दुसरे म्हणजे आपण सत्याचा स्वीकार करीत नाही. मनात सतत जागृत असणारे काम,क्रोध,मोह,लोभ,मद,मत्सर हे षड्रिपू तर मानसिक अस्वस्थतेला आणि अशांततेला जबाबदार आहेतच; पण आधी सांगितलेली दोन कारणेच या षड्रिपूंमुळे होणाऱ्या मानसिक त्रासाला कारणीभूत असतात हे खोलवर विचार केल्यास लक्षात येईल.
▶आपण एकतर स्वतःच्या भूतकाळात जगतो किंवा भविष्यकाळात! काल (म्हणजे पूर्वायुष्यात) जे झाले ते खूपच वाईट होते या विचाराच्या दडपणाखाली तरी आपण जगतो किंवा/आणि उद्या माझे (आणि, या मर्त्य जगाचे) काय होणार या चिंतेत तरी जगतो. या दोन्हींचे ओझे सांभाळण्याच्या नादात आज आपण काय करायचे आहे किंवा केले पाहिजे याकडे जाणते-अजाणतेपणे दुर्लक्ष करतो (आणि उद्याचे ओझे आणखी वाढवून ठेवतो!).
⏩भूतकाळ विसरावा असे मी म्हणणार नाही. मात्र त्यातील घटनांमधून आपण योग्य तो धडा घेऊन झालेल्या चुका परत होणार नाहीत याची दक्षता मात्र जरूर घ्यावी. त्याचप्रमाणे भविष्यकाळाचा विचार करू नये असेही नाही...विचार करून योग्य ते नियोजन करावे व त्यानुसार कार्यरत व्हावे,ज्यामुळे भविष्यातील संभाव्य समस्या निर्माण होण्याआधीच टाळता येतील.
⏩लक्षात ठेवा,चिता माणसाला मेल्यावर जाळते तर चिंता मात्र त्याला जिवंतपणीच भस्मसात करते.
⏩ताओ विचारसरणीनुसार 'स्व-स्वीकार' हा यावरील उत्तम मार्ग आहे. आपले इगो, सामाजिक-आर्थिक स्थान, पदे, पदव्या यांचा विचार न करता आहे त्या अवस्थेत स्वतःला स्वीकारणे हा यावरील पहिला व सर्वोत्तम उपाय आहे. एकदा स्वतःकडे त्रयस्थपणे पहायला सुरुवात केली की मग मोठे-मोठे प्रश्नही लहान-सहान वाटू लागतात. (बघा आठवून, आपल्या लहान समस्याही आपण इतरांकडे खूप मोठ्या आहेत अशा प्रकारे मांडतो,तर त्यांचे मोठे-मोठे प्रश्न ऐकून घ्यायलाही आपल्याला फुरसत नसते (अर्थात तसे आपण दाखवितो)).
▶आपण आपला भूतकाळ कोणत्याच पद्धतीने बदलू शकत नाही या सत्याचाही आपण जेवढ्या लवकर व सहजतेने स्वीकार करू तेवढे चांगले!
▶एखादी गोष्ट करण्याची आपली कुवत नाही याची आपणास जाणिव झाल्यावरही आपण विनाकारण आदळआपट करून मानसिक अशांतता निर्माण करतो याचीही आपणास कल्पना असावयास हवी. कुवत नसतानाही पत्नीचे सोन्याचे दागिने गहाण ठेऊन स्मार्टफोन विकत घेऊन आतबट्ट्याचा व्यवहार करणारे लोकही मी पाहिले आहेत. असे लोक पुढे आर्थिक बाबींमुळे मानसिक अस्वस्थतेच्या गर्तेत सापडणे अवघड नाही.
▶वेळेच्या अभाव असतानाही गरजेपेक्षा जास्त काम स्वतःहून ओढवून घेणारेही बरेच लोक आपल्या आसपास असतात. त्यामुळे स्वतःसाठी व कुटुंबासाठी वेळ काढता न आल्यामुळे विनाकारण चीडचीड करून मानसिक स्वास्थ्य हरवलेलेही बरेच लोक असतात व त्याचा उपायही सहजतेने ते शोधू शकतात.
▶रोजच्या जगण्यात छोट्या छोट्या समस्यांकडे केलेले दुर्लक्षही भविष्यात खूप मोठ्या समस्यांना जन्म देऊ शकते याचाही आपण विचार केला पाहिजे. बऱ्याच मोठ्या समस्यांचेही तेच मूळ असते. त्यामुळे आज उद्भवलेल्या लहान-सहान समस्या आजच्या आजच व पूर्णपणे सोडविल्या तर पुढील मोठ्या समस्या टाळता येऊन मानसिक शांतता प्राप्त करता येईल.
▶आपण घेतलेल्या निर्णयांची आपण स्वतः पूर्ण जबाबदारी घेणेही तितकेच गरजेचे आहे. आपण एखाद्या घटनेवर व्यक्त केलेली प्रतिक्रिया किंवा कृती प्रामाणिक व मनापासून केलेली असावी म्हणजे वेळोवेळी भूमिका बदलण्याचे दडपण आपणावर येणार नाही व मानसिक स्थिरता सहज येईल.
▶आपल्या भावना व दुखण्यांकडे दुर्लक्ष करून आपण त्या केवळ पुढे ढकलतो; पण पुढे ढकलणे म्हणजे समस्या सुटणे नव्हे याचाही विचार आपण करायला हवा. जगाच्या भावनांच्या आधी स्वतःच्या भावनांची कदर करायला आपण शिकले पाहिजे, असा याचा अर्थ आहे. मानसिक शांततेसाठी हीही एक गरजेची गोष्ट आहे.
▶आपली स्व-प्रतिमा, वैचारिक प्रगल्भता, ध्येये व स्वतःसंबंधीच्या अन्य वैचारिक बाबींची पातळी आपण आधीच ठरवून घेणे आवश्यक आहे, ज्यामुळे एखादा महत्त्वाचा निर्णय घेणे सोपे होईल व मानसिक स्थिरता राखणे सोपे जाईल.
▶कोणतेही महत्त्वाचे निर्णय हे तत्कालिक आवेशात व भावनेच्या भरात न घेता पूर्ण विचारांती व बऱ्या-वाईटाचा समग्र विचार करून घेणे हे मानसिक सदृढतेचे एक लक्षण आहे व मानसिक स्थिरतेकडे नेणारा हा मार्ग आहे.
▶▶▶लेखाचा समारोप मी जॉन एफ.केनेडी यांच्या एका प्रसिद्ध वाक्याने करेन..."Peace is a daily, a weekly, a monthly process, gradually changing opinions, slowly eroding old barriers, quietly building new structures."
⏩लक्षात असू द्या..."Peace begins with a smile!" (Mother Teresa)(एका सुंदर हास्याने शांततेची सुरुवात होते.)
(©२०१६,डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील,
वैद्यकीय अधिकारी गट 'अ',
प्राथमिक आरोग्य केंद्र भाताणे, जि. पालघर.)
(प्रस्तुत लेखक मान. श्री. आर. आर. (आबा) पाटील, माजी उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे सख्खे भाचेे आहेत.)
▶▶▶२१ सप्टेंबर- आंतरराष्ट्रीय शांतता दिन◀◀◀
(©२०१६,डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील,
वैद्यकीय अधिकारी गट 'अ',
प्राथमिक आरोग्य केंद्र भाताणे, जि. पालघर.)
(प्रस्तुत लेखक मान. श्री. आर. आर. (आबा) पाटील, माजी उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे सख्खे भाचेे आहेत.)
🕊🕊🕊🕊🕊🕊🕊🕊🕊🕊🕊
आज साजरा होत असलेल्या आंतरराष्ट्रीय शांतता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
▶दरवर्षी २१ सप्टेंबर हा दिवस संयुक्त राष्ट्रातर्फे आंतरराष्ट्रीय शांतता दिन म्हणून साजरा केला जातो.
Sustainable Development Goals: Building Blocks for Peace (शाश्वत विकास ध्येये: शांततेचा पाया) हे २०१६ या वर्षीचे या दिनाचे बोधवाक्य आहे.
▶आजचाच दिवस आंतरराष्ट्रीय वैयक्तिक व अांतर्देशीय शस्त्रसंधी दिवस म्हणून पाळला जातो.
▶बऱ्याच धर्मांमध्ये शांततेचे प्रतीक समजले जाणारे ऑलिव्हची पाने तोडात धरलेले पांढरे कबूतर हे या दिनाचे व एकूणच शांततेचे बोधचिन्ह ठरविले गेले आहे.
▶अल्बर्ट आईनस्टाईनने म्हटले आहे की,"बळाचा वापर करून शांतता प्रस्थापित करता येत नाही. ती केवळ सामंजस्यातूनच मिळविता येते." (Peace cannot be kept by force. It can only be achieved by understanding.)
दुर्दैवाने या महान व्यक्तीने सुचविलेल्या मार्गाच्या अगदी विपरीत मार्गाने आज जगभर शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. भारताचा काश्मीर प्रश्न असो की पाकिस्तानचा बलुचिस्तान प्रश्न असो, सीरियातील अंतर्गत बंडाळीची समस्या असो की उत्तर कोरियाच्या अण्वस्त्र चाचणीचा प्रश्न...सर्वत्रच छुप्या किंवा उघड लष्करी बळाचा वापर करूनच हे प्रश्न सोडविण्याचा (की, खरे तर नवीनच प्रश्न तयार करण्याचा) यांतून प्रयत्न केला जातो.
पाकिस्तानसारख्या दहशतवादी राष्ट्रालाही त्याचा तत्कालिक निषेध करण्याव्यतिरिक्त काहीच न करता केवळ त्याच्या भूराजकीय स्थानाचा विचार करून बड्या राष्ट्रांकडून शस्त्रास्त्र निर्मितीत सहकार्य केले जाते.
बड्या राष्ट्रांच्या वैयक्तिक स्वार्थ साधण्याच्या प्रवृत्तीमुळे जगाचे विविध कारणांसाठी लढणाऱ्या गटांत त्यांनी विभाजन केले आहे. सर्वांनी एकमेकांच्या हातात हात देऊन अखिल मानवजातीचा विकास साधण्याएेवजी हे देश एकमेकांच्या पायात पाय घालून दुसरे मागे राहून केवळ स्वतःचीच प्रगती कशी होईल याचा विचार करतात.
अशा प्रकारे सातत्याने युद्धजन्य परिस्थितीची टांगती तलवार डोक्यावर असताना जग शांततेत नांदणे केवळ अशक्य आहे.
(©२०१६,डॉ.अमित सुमन तुकाराम पाटील
सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित)
Dr. Amit Suman Tukaram Patil:
▶▶▶ केवळ लष्करी गैरवापरामुळेच अशांतता पसरते असे मानणे पूर्णतः चुकीचे आहे. सध्या कर्नाटक-तामिळनाडूमध्ये कावेरी नदीच्या पाणीवाटपाबद्दलच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे चालू असलेली दंगल ही भौगोलिक व पर्यावरणीय बाबींच्या असमतोलामुळे निर्माण झालेल्या किंवा होऊ शकणाऱ्या मोठ्या अशांततेची प्रतीक आहे. आईनस्टाईनने म्हटल्याप्रमाणे न्यायालयीन किंवा पोलिसी बळाचा वापर करून असे प्रश्न सुटत नसतात हे या प्रकरणातून स्पष्टपणे जाणवते.
▶दुष्काळासारखी पर्यावरणीय व नैसर्गिक आपत्तीही मानवाची शांत झोप उडवू शकते, असा बोध ह्या घटनेतून घेतला जावा. त्यामुळे अगदी झाडे लावण्यापासून ते प्लॅस्टिकचा वापर टाळण्यापर्यंतच्या कृती अंमलात आणून आपण अखंड मानवजातीला शांततेच्या दिशेने वळवू शकतो ही येथे लक्षात घेण्याजोगी बाब आहे.
© Dr. Amit Suman Tukaram Patil:
▶सध्या पालघर जिल्ह्यातील जव्हार व मोखाडा भागात कुपोषणाने होत असलेले बालमृत्यू गाजत आहेत. अगदी आदिवासी विकास मंत्र्यांनी बालमृत्यू झालेल्या घरांना भेटी देण्याचा प्रयत्न केला असता तेथे काम करणाऱ्या काही संघटना व स्थानिक जनतेने त्यांना विरोध केला. वस्तुतः या मंत्रिमहोदयांच्या वैयक्तिक चुका किंवा उणिवांमुळे निर्माण झालेला हा प्रश्न नव्हे; पण शिक्षण व आरोग्य सेवांचा स्वतःच्या विकासासाठी आजही हे आदिवासी बांधव उपयोग करू शकले नाहीएत हे कटू असले तरी सत्य आहे. अशा वेळी या देशाचे नागरिक व आपले देशबांधव म्हणून या लोकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे ही आपली व शासनाची मुख्य जबाबदारी आहे.
▶सर्वसमावेशक शिक्षणाचा व आरोग्य सुविधांचा अभाव किंवा या सुविधा सामान्य जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी कमी पडत असलेले आपले व लोकनियुक्त शासनाचे प्रयत्न हे अशा प्रकारे मानवी अशांततेचे कारण ठरू शकतात हे यातून सूचित होते.
©2016,Dr. Amit Suman Tukaram Patil:
▶प्रादेशिक व भाषिक अस्मितेच्या प्रश्नांचा योग्य विचार न करता मोठ्या जनसमुदायाला न पटणारे काही निर्णय घेतले तर संयुक्त महाराष्ट्राच्या किंवा आंध्र-तेलंगणाच्या प्रश्नासारखा जटील प्रश्न निर्माण होऊ शकतो याला इतिहास साक्षीदार आहे. त्यामुळे अन्न, वस्त्र, निवारा व सुरक्षितता यांबरोबरच भाषिक व प्रादेशिक अस्मितांची जपवणूक हीही गोष्ट मानवी शांततेसाठी तितकीच गरजेची असते हे यातून सिद्ध होते. प्रत्येक व्यक्ती, व्यक्तिसमूह व समाजाला स्वतःचा स्वाभिमान जपण्याचा व त्यासाठी योग्य ते प्रयत्न करण्याचा अधिकार दिला गेला पाहिजे. ही एक अशी गोष्ट आहे की ज्यामुळे जनसमूहाची सांस्कृतिक भूक भागली जाऊन व्यापक मानवी शांतता प्रस्थापित होण्याच्या कामात मदत होते.
©2016,Dr. Amit Suman Tukaram Patil:
▶वरील गोष्टींबरोबरच वांशिक व धार्मिक स्वातंत्र्य व अस्मिता जोपासण्याचा अधिकार असणेही मानवी शांततेच्या दृष्टीने आवश्यक गोष्ट आहे. हिटलरने केलेल्या ज्यू लोकांच्या कत्तली व पिळवणूक हे वांशिक अस्मितेच्या दमनाचे एेतिहासिक उदाहरण आहे. या भूतकाळातील घटनांतून ज्यू समुदाय अद्यापही सावरला नसल्यासारखे वाटते. सीरियातील वांशिक दंगली, शिया-सुन्नी पंथांत होणारी भांडणे याबरोबरच इस्राइल-पॅलेस्टाइनमधील प्रश्नही प्रामुख्याने वांशिक कारणांमुळेच उद्भवला आहे. यामुळे मध्य-पूर्व आशियात सततचीच अशांतता असते. मानवी प्रगतीच्या व शांततामय मार्गाने जीवन व्यतीत करण्याच्या प्रयत्नांत या गोष्टींमुळे अडथळा निर्माण झाला आहे.
© 2016,Dr. Amit Suman Tukaram Patil: (©२०१६,डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील,
वैद्यकीय अधिकारी गट 'अ',
प्राथमिक आरोग्य केंद्र भाताणे, जि. पालघर.)
(प्रस्तुत लेखक मान. श्री. आर. आर. (आबा) पाटील, माजी उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे सख्खे भाचेे आहेत.)
▶▶▶उपाय काय?
▶वर उल्लेख केलेल्या उदाहरणांमध्ये विविध प्रकारे निर्माण होणाऱ्या मानवी समुदायामधील अशांततेची जी कारणे सांगितली आहेत ती चर्चा व सामंजस्याने नष्ट करणे हाच शाश्वत शांतता प्रस्थापित करण्याचा एकमेव मार्ग आहे.
कोणत्याही ठोस कृतीशिवाय केवळ वर-वर बोलून किंवा मनापासून प्रयत्न न करून असे प्रश्न सुटू शकत नाहीत.
अशांतता छोट्या छोट्या कारणांमुळे नक्कीच पसरत नाही, त्यामुळे उपस्थित झालेले प्रश्न जटील आहेत व त्यामुळे ते सोडविणे कठीण आहे असे म्हणणे ही लंगडी सबब आहे. प्रश्न अशा पद्धतीने सोडविले जाणे गरजेचे आहे ज्यामध्ये मुख्य समस्या अगदी मुळापासून चर्चिली जाऊन सोडविली गेली पाहिजे व काढण्यात आलेला तोडगा बहुसंख्येने दोन्ही बाजूंना मान्य झाला पाहिजे.
▶बळाचा वापर करून असे उपाय मानवसमूहाच्या गळी उतरवणे शक्य नसते, हे इतिहासाने वारंवार सिद्ध केले आहे.
मुळात एका मोठ्या जनसमूहाचा प्रश्न म्हणून त्याकडे संबंधितांनी सह-अनुभूतीने (empathy) व मान्यतेनच्या भावनेने (sympathy) पाहिले पाहिजे.
▶प्रश्न सोडविताना आपण कोणावर तरी उपकार करतोय अशी भावना उपाय शोधणाऱ्यांच्या ठायी असणे उपयोगाचे नाही. अखिल मानवजातीच्या वैश्विक शांतता व स्थिरतेसाठी उपायकर्त्यांकडून प्रयत्न होणे अपेक्षित अाहे.
▶बऱ्याच समस्या वर्षानुवर्षे सुटत नाहीत याचे मुख्य कारण एकतर त्या व्यक्तिसमूहाचा किंवा राज्य-देशाचा अहंकार हे असते (उदा. महाराष्ट्र- कर्नाटक सीमाप्रश्न किंवा भारत-पाकिस्तान प्रश्न) अथवा त्या प्रश्नाकडे व्यापक नजरेतून न बघता वैयक्तिक किंवा संकुचित भावनेने बघणे हेही असू शकते. मोठे प्रश्न सोडविताना सामूहिक जनभावनेचा विचार होणे आत्यंतिक गरजेचे आहे असे प्रस्तुत लेखकाला वाटते.
▶एखाद्या समाजघटकाकडे पूर्वग्रहदूषित नजरेने (उदा. सध्या गाजत असलेले मराठा समाजाचे मोर्चे) किंवा तिरस्कृतपणे (उदा. हिटलरचा ज्यू धर्माबाबतचा दृष्टिकोन) बघणे हे अशा समस्या न सुटण्यामागचे आणखी एक महत्त्वाचे कारण आहे. समस्या सोडविण्यापूर्वी असे दृष्टिकोन बदलून त्या समस्यांकडे तटस्थपणे (impartially) व त्रयस्थपणे (as a third party) पाहणे गरजेचे आहे.
▶एखाद्या उपायकर्त्याची संबंधित प्रश्नात भावनिक गुंतवणूक (emotional attachment) नसणेही खूप आवश्यक आहे.
⏩महात्मा गांधीजींचे एक वाक्य मला खूप आवडते. ते एके ठिकाणी म्हणाले होते, "an eye for an eye only ends up making the whole world blind." (डोळ्याला डोळे भिडवले तर सगळं जगच आंधळं होईल.) हा विचार जितका सुंदर आहे तितकाच त्यामागील गर्भितार्थही!
▶मला वाटते, डोळ्यांना डोळे भिडविण्यापेक्षा खांद्याला खांदा लावून काम केले तर जास्त फायदा होईल.
त्याचप्रमाणे वर्षानुवर्षे चालत आलेली एखादी समस्या एखाद्या प्रभावी व्यक्तीच्या किंवा व्यक्तिगटाच्या किंवा मोठ्या प्रमाणावरील बहुमताने निवडून आलेल्या सरकारच्या उदयामुळे चुटकीसरशी सुटतील अशी अपेक्षा करणे हे केवळ भाबडेपणाचेच नव्हे तर सत्य परिस्थितीच्या विपरीत ठरेल. अशा समस्या सोडविण्यासाठी पूरेपूर वेळ देऊन सर्वमान्य ठरेल असा तोडगा (golden mean) काढला तर दीर्घकाळ अस्वस्थता (unrest) दूर करून शांतता प्रस्थापनेच्या कामात मोलाची मदत होऊन त्या प्रश्नाच्या समाधानकारक उकलीमागील तो एक मैलाचा दगड ठरेल.
© Dr. Amit Suman Tukaram Patil: (©२०१६,डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील,
वैद्यकीय अधिकारी गट 'अ',
प्राथमिक आरोग्य केंद्र भाताणे, जि. पालघर.)
(प्रस्तुत लेखक मान. श्री. आर. आर. (आबा) पाटील, माजी उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे सख्खे भाचेे आहेत.)
▶▶▶बाह्य शांततेचे झाले; पण माझ्या आंतरिक शांततेचे काय?
▶'सर सलामत तो पगडी पचास' अशी एक म्हण आहे. जागतिक प्रश्न वगैरे ठीक आहेत; पण माझ्या अस्थिर, चंचल आणि अस्वस्थ मनाचे काय असा प्रश्न (माझ्यासह) बऱ्याच जणांना बऱ्याच वेळा पडतो, त्याचे काय करायचे असे तुम्ही मला विचाराल. प्रश्न एकदम रास्त आहे; पण खूप अवघड नाही.
⏩गौतम बुद्धांनी अगदी एका वाक्यात याचे उत्तर दिले आहे,"Peace comes from within. Do not seek it without." (शांतता ही मनाच्या आतून येते, तिचा शोध बाहेरच्या जगात घेऊ नका.)
▶एक गोष्ट सूर्यप्रकाशाइतकी स्वच्छ आणि स्पष्ट आहे की, तुमच्या परवानगीशिवाय कोणी तुमचे मन अस्वस्थ व म्हणून अशांत करू शकत नाही...तुमच्या परवानगीशिवाय कोणी तुमचा पराभव करू शकत नाही!
▶आपल्या मानसिक अशांततेचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे आपण स्वतःचा आहे तसा स्वीकार करीत नाही व दुसरे म्हणजे आपण सत्याचा स्वीकार करीत नाही. मनात सतत जागृत असणारे काम,क्रोध,मोह,लोभ,मद,मत्सर हे षड्रिपू तर मानसिक अस्वस्थतेला आणि अशांततेला जबाबदार आहेतच; पण आधी सांगितलेली दोन कारणेच या षड्रिपूंमुळे होणाऱ्या मानसिक त्रासाला कारणीभूत असतात हे खोलवर विचार केल्यास लक्षात येईल.
▶आपण एकतर स्वतःच्या भूतकाळात जगतो किंवा भविष्यकाळात! काल (म्हणजे पूर्वायुष्यात) जे झाले ते खूपच वाईट होते या विचाराच्या दडपणाखाली तरी आपण जगतो किंवा/आणि उद्या माझे (आणि, या मर्त्य जगाचे) काय होणार या चिंतेत तरी जगतो. या दोन्हींचे ओझे सांभाळण्याच्या नादात आज आपण काय करायचे आहे किंवा केले पाहिजे याकडे जाणते-अजाणतेपणे दुर्लक्ष करतो (आणि उद्याचे ओझे आणखी वाढवून ठेवतो!).
⏩भूतकाळ विसरावा असे मी म्हणणार नाही. मात्र त्यातील घटनांमधून आपण योग्य तो धडा घेऊन झालेल्या चुका परत होणार नाहीत याची दक्षता मात्र जरूर घ्यावी. त्याचप्रमाणे भविष्यकाळाचा विचार करू नये असेही नाही...विचार करून योग्य ते नियोजन करावे व त्यानुसार कार्यरत व्हावे,ज्यामुळे भविष्यातील संभाव्य समस्या निर्माण होण्याआधीच टाळता येतील.
⏩लक्षात ठेवा,चिता माणसाला मेल्यावर जाळते तर चिंता मात्र त्याला जिवंतपणीच भस्मसात करते.
⏩ताओ विचारसरणीनुसार 'स्व-स्वीकार' हा यावरील उत्तम मार्ग आहे. आपले इगो, सामाजिक-आर्थिक स्थान, पदे, पदव्या यांचा विचार न करता आहे त्या अवस्थेत स्वतःला स्वीकारणे हा यावरील पहिला व सर्वोत्तम उपाय आहे. एकदा स्वतःकडे त्रयस्थपणे पहायला सुरुवात केली की मग मोठे-मोठे प्रश्नही लहान-सहान वाटू लागतात. (बघा आठवून, आपल्या लहान समस्याही आपण इतरांकडे खूप मोठ्या आहेत अशा प्रकारे मांडतो,तर त्यांचे मोठे-मोठे प्रश्न ऐकून घ्यायलाही आपल्याला फुरसत नसते (अर्थात तसे आपण दाखवितो)).
▶आपण आपला भूतकाळ कोणत्याच पद्धतीने बदलू शकत नाही या सत्याचाही आपण जेवढ्या लवकर व सहजतेने स्वीकार करू तेवढे चांगले!
▶एखादी गोष्ट करण्याची आपली कुवत नाही याची आपणास जाणिव झाल्यावरही आपण विनाकारण आदळआपट करून मानसिक अशांतता निर्माण करतो याचीही आपणास कल्पना असावयास हवी. कुवत नसतानाही पत्नीचे सोन्याचे दागिने गहाण ठेऊन स्मार्टफोन विकत घेऊन आतबट्ट्याचा व्यवहार करणारे लोकही मी पाहिले आहेत. असे लोक पुढे आर्थिक बाबींमुळे मानसिक अस्वस्थतेच्या गर्तेत सापडणे अवघड नाही.
▶वेळेच्या अभाव असतानाही गरजेपेक्षा जास्त काम स्वतःहून ओढवून घेणारेही बरेच लोक आपल्या आसपास असतात. त्यामुळे स्वतःसाठी व कुटुंबासाठी वेळ काढता न आल्यामुळे विनाकारण चीडचीड करून मानसिक स्वास्थ्य हरवलेलेही बरेच लोक असतात व त्याचा उपायही सहजतेने ते शोधू शकतात.
▶रोजच्या जगण्यात छोट्या छोट्या समस्यांकडे केलेले दुर्लक्षही भविष्यात खूप मोठ्या समस्यांना जन्म देऊ शकते याचाही आपण विचार केला पाहिजे. बऱ्याच मोठ्या समस्यांचेही तेच मूळ असते. त्यामुळे आज उद्भवलेल्या लहान-सहान समस्या आजच्या आजच व पूर्णपणे सोडविल्या तर पुढील मोठ्या समस्या टाळता येऊन मानसिक शांतता प्राप्त करता येईल.
▶आपण घेतलेल्या निर्णयांची आपण स्वतः पूर्ण जबाबदारी घेणेही तितकेच गरजेचे आहे. आपण एखाद्या घटनेवर व्यक्त केलेली प्रतिक्रिया किंवा कृती प्रामाणिक व मनापासून केलेली असावी म्हणजे वेळोवेळी भूमिका बदलण्याचे दडपण आपणावर येणार नाही व मानसिक स्थिरता सहज येईल.
▶आपल्या भावना व दुखण्यांकडे दुर्लक्ष करून आपण त्या केवळ पुढे ढकलतो; पण पुढे ढकलणे म्हणजे समस्या सुटणे नव्हे याचाही विचार आपण करायला हवा. जगाच्या भावनांच्या आधी स्वतःच्या भावनांची कदर करायला आपण शिकले पाहिजे, असा याचा अर्थ आहे. मानसिक शांततेसाठी हीही एक गरजेची गोष्ट आहे.
▶आपली स्व-प्रतिमा, वैचारिक प्रगल्भता, ध्येये व स्वतःसंबंधीच्या अन्य वैचारिक बाबींची पातळी आपण आधीच ठरवून घेणे आवश्यक आहे, ज्यामुळे एखादा महत्त्वाचा निर्णय घेणे सोपे होईल व मानसिक स्थिरता राखणे सोपे जाईल.
▶कोणतेही महत्त्वाचे निर्णय हे तत्कालिक आवेशात व भावनेच्या भरात न घेता पूर्ण विचारांती व बऱ्या-वाईटाचा समग्र विचार करून घेणे हे मानसिक सदृढतेचे एक लक्षण आहे व मानसिक स्थिरतेकडे नेणारा हा मार्ग आहे.
▶▶▶लेखाचा समारोप मी जॉन एफ.केनेडी यांच्या एका प्रसिद्ध वाक्याने करेन..."Peace is a daily, a weekly, a monthly process, gradually changing opinions, slowly eroding old barriers, quietly building new structures."
⏩लक्षात असू द्या..."Peace begins with a smile!" (Mother Teresa)(एका सुंदर हास्याने शांततेची सुरुवात होते.)
(©२०१६,डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील,
वैद्यकीय अधिकारी गट 'अ',
प्राथमिक आरोग्य केंद्र भाताणे, जि. पालघर.)
(प्रस्तुत लेखक मान. श्री. आर. आर. (आबा) पाटील, माजी उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे सख्खे भाचेे आहेत.)
Chhan Amit !
ReplyDeleteThanks a lot Santosh.
ReplyDeleteYou are the first in 2016 to comment on my articles.
Keep supporting me and recommend to others.
Very Nice!!
ReplyDeleteVery Nice!!
ReplyDelete