जागतिक महिला दिन: सीता, द्रौपदी, राधा चर्चिल्या तरी गेल्या; पण उर्मिला, मंदोदरी, रुक्मिणीचे काय? (International Women's Day: Fair with Seeta, Draupadi, Radha but what about Urmila, Mandodari and Rukmini)
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने...
सीता, द्रौपदी, राधा चर्चिल्या तरी गेल्या; पण उर्मिला, मंदोदरी, रुक्मिणीचे काय?
(©डॉ.अमित सुमन तुकाराम पाटील)
(©या लेखाचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत.)
(केवळ वॉट्सअॅप संपर्कासाठी- ७८८७५६९६९९)
दरवर्षी ८ मार्चला आपण सगळे 'जागतिक महिला दिन' साजरा करतो. असाच एखादा दिवस 'जागतिक पुरुष दिन' बहुधा नसतो. याचे कारण स्पष्ट आहे की, मानवी जीवनाच्या उत्पत्तीपासून पुरुष कर्तृत्व गाजवणार आणि महिला 'चूल आणि मूल' या गोष्टींच्या बाहेर पडणार नाहीत हे जगातल्या सर्व आधुनिक संस्कृतींनी आणि धर्मांनी जणू गृहीतच धरले होते.
आणि म्हणून, आत्ता गेल्या शंभर- सव्वाशे वर्षांत स्त्रिया घराबाहेर पडून विविध क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवू लागल्या आहेत यासाठी 'जागतिक महिला दिन' साजरा केला जातो.
मानवी मानसिकतेची ही मूलभूत आधाररेखा समजून घेतली गेली पाहिजे. युगानुयुगे कर्तृत्व गाजविण्याचे काम by default पुरुषच करतात, ही ती मानसिकता!
कदाचित या क्षणाला माझा विचार चुकीचा किंवा हास्यास्पद वाटेल; पण माझे मत असे आहे की, खरे तर स्त्रियांनी जीवनाच्या सर्व महत्त्वपूर्ण क्षेत्रांत इतकी प्रगती करावी की मग त्यांच्या कर्तृत्वाला सलाम करण्यासाठी विशेष 'महिला दिना'ची आवश्यकता वाटू नये. इतके त्यांचे अस्तित्व मानवी जीवनात सामान्य व्हावे!!!
अगदी पुराणकाळापासून स्त्रीने करावयाची कामे आणि पुरुषाने करावयाची कामे अशी विभागणी केली गेली. पहिल्यांदा ही विभागणी शारीरिक वैशिष्ट्यांना अनुसरून करण्यात आली होती. मात्र हळूहळू हे एक बंधन ठरत गेले. शारीरिक वैशिष्ट्यांवर आधारित झालेली नैसर्गिक व्यवस्था नंतर समाजाच्या मनोवस्थेचा पाया ठरत गेली.
खूप अनोळखी उदाहरणे घ्यायला नकोत. आपल्या काही महाकाव्यातील उदाहरणांबद्दल मला अगदी थोडेसे बोलायचे आहे. या उदाहरणांमधून पुरूष आणि स्त्रीच्या मनातील पारंपारिक पुरुषी मानसिकतेच्या वर्चस्वाचा विचारानुभव घेता येईल.
सीतेचा त्याग मान्य झाला आहे आणि पुरुषी मानसिकतेने स्त्रीवर सातत्याने केलेल्या अन्यायाचे प्रतीक म्हणून सीतेकडे पाहण्याचा आधुनिक दृष्टिकोन आहे. पण, मी फक्त सीतेबद्दल बोलून थांबू इच्छित नाही. मला इथे तीन महिलांबद्दल बोलायचे आहे.
पहिली अर्थातच आहे, सीता.
सीता हे स्त्रीच्या बुद्धिमत्ता, चातुर्य, शौर्य, स्वाभिमान आणि त्यागाचे मूर्तिमंत नाव बनून गेले आहे. आणि, तिचा पती राम हा आदर्श राजा म्हणून अखंड भारतवर्षात इतका प्रसिद्ध आहे की, चांगल्या पद्धतीने केल्या जाणाऱ्या राज्यकारभाराला आता 'रामराज्य' या त्याच्याच नावाने ओळखले जाते. आणि, रावण मात्र बुद्धिमान आणि शूर असूनही तो केवळ रामाचा शत्रू म्हणूनच जास्त (कु)प्रसिद्ध झाला आहे.
राज्यकर्ते म्हणून राम आणि रावण यांच्याबद्दल आपण बरे- वाईट बोलू शकतो. परंतु, एक पती म्हणून आपण त्यांची कशी तुलना करणार?
राम-रावण युद्ध सुरू असताना रावणाची पत्नी मंदोदरीवर शत्रूसैन्यातील काही सैनिकांनी बलात्कार केला. रावणाला ही बातमी कळाली तेव्हा तो दुःखी आणि उद्विग्न झाला. तो कालखंड असा होता की, बलात्कार तर खूप लांबची गोष्ट झाली, साधे एखाद्या स्त्रीकडे बघणेही गंभीर गुन्हा मानला जायचा. अशा सामाजिक परिस्थितीत लंकाधीश रावणाच्या पत्नीवर- लंकेच्या सम्राज्ञीवर- बलात्कार झाला होता. अगदी आजच्या काळातही बलात्कारित स्त्रीवर सामाजिक बहिष्कार टाकला जातो. तो काळ तर टोकाच्या सामाजिक रुढींच्या पालनाचा होता. तरीही, रावणाने मंदोदरीला अव्हेरले नाही. तो तिच्याजवळ पोहोचला. तिच्या उघड्या कायेवर वस्त्र टाकले आणि तिला आपल्या रथात बसवून महालात घेऊन आला. रावण लंकानरेश होता. त्याने विचार केला असता तर, तो मंदोदरीला त्याच अवस्थेत सोडून निघून जाऊ शकला असता. त्याच्या राज्यात कुणीही त्याला प्रबळ विरोध करणे शक्य नव्हते. तरीही, त्याने मंदोदरीला स्वतः जाऊन रथातून राजवाड्यात आणले. रावणाने एक पती म्हणून असणारे त्याचे कर्तव्य पूर्ण केले.
याउलट, मला रामाचे उदाहरण वाटते. सीतेच्या चारित्र्याबद्दल सीतेला आणि रामाला पूर्ण खात्री असूनही एका संकुचित मनोवृत्तीच्या धोब्याचा आक्षेप ग्राह्य मानून त्याने सीतेला अग्निपरीक्षा द्यायला भाग पाडले. हे करताना सीतेच्या मनातील वेदनांचा मात्र ना रामाने विचार केला ना रामराज्यातील जनतेने. स्वतःच्या 'आदर्श आणि मर्यादापुरुषोत्तम' या प्रतिमांची चाचणी करण्यासाठी रामाने सीतेला अग्निपरीक्षेचे दिव्य पेलायला सांगितले.
मग, येथे एक पुरुष आणि पती म्हणून राम योग्य ठरतो की रावण?
दुसरी स्त्री म्हणजे, उर्मिला!
उर्मिला ही लक्ष्मणाची पत्नी. तोच हा लक्ष्मण ज्याने आपल्या भावाच्या सेवेत अडथळा नको आणि आपल्या आईची काळजी कोणीतरी जबाबदारपणे काळजी घ्यायला हवी म्हणून आपली पत्नी उर्मिला हिला आपल्याबरोबर येऊ दिले नाही. लक्ष्मणाचे हेतू उच्च दर्जाचे होते यात मुळीच शंका नाही आणि त्यासाठी आपण रामाबरोबर लक्ष्मणाचीही पूजा करतो. भारतात जी काही रामाची मंदिरे आहेत त्यात 'दक्षिणे लक्ष्मणो यस्य', म्हणजे 'ज्याच्या उजव्या बाजूला लक्ष्मण आहे' असे खुद्द रामाचे वर्णन आहे इतका तो पूजनीय आहे. परंतु, या 'राम, लक्ष्मण, जानकी' मध्ये 'उर्मिला' कुठे आहे? भाऊ म्हणून लक्ष्मण सर्वश्रेष्ठ आहे; पण 'पती' म्हणून लक्ष्मण किती श्रेष्ठ आहे? यातील विचार करण्याची गोष्ट म्हणजे, 'मर्यादा पुरुषोत्तम आणि आदर्श राजा' म्हणून रामाचे, 'त्यागाचे मूर्तिमंत प्रतीक' म्हणून सीतेचे आणि 'सर्वश्रेष्ठ भाऊ' म्हणून लक्ष्मणाचे कौतुक करताना या कर्त्या स्त्री- पुरुषांच्या पाठीमागे त्यांचे घर यशस्वीरीत्या सांभाळणारी 'उर्मिला' आपल्या कधी ध्यानीमनी तरी येते का? घरातील ज्येष्ठ सून वनवासात असताना आणि ज्याची ती 'अर्धांगिनी' आहे असा पती लक्ष्मण तिच्या बरोबर नसताना तिने सूनेची जी कर्तव्ये पार पाडली त्याचा हिशोब आपण कधी करणार? काही काव्यात असे म्हटले जाते की, लक्ष्मण वनवासात राम- सीतेचे रक्षण करण्यासाठी सलग चौदा वर्षे न झोपता जागा राहण्याची प्रतिज्ञा करतो. परंतु, लक्ष्मण निसर्गनियमाविरुद्ध असा वागू शकत नाही असे 'निद्रादेवी' त्याला बजावते. त्यावर, 'माझी निद्रा तू माझ्या पत्नीकडून पूर्ण करून घे' अशी विनंती लक्ष्मण निद्रादेवीला करतो. अशा एका आख्यायिकेच्या आधारे उर्मिला चौदा वर्षे झोपून राहिली, ज्याला 'उर्मिला निद्रा' असे म्हणतात.
आता विचार करा...इथेही बळी उर्मिलेचाच! लक्ष्मण जर चौदा वर्षे सलग जागून निसर्गनियमाविरुद्ध जाऊ शकत नसेल तर त्याची पत्नी 'उर्मिला' सलग चौदा वर्षे झोपून त्या नियमाविरुद्ध कशी काय जाऊ शकते? किंवा, स्पष्टच बोलायचे तर हे चुकीचे काम करण्यासाठी लक्ष्मण कशाच्या आधारावर उर्मिलेची निवड करतो?
मग, गृहकर्तव्य असो वा 'उर्मिलानिद्रा', उर्मिलेला तिच्या त्यागाएवढे महत्त्व मिळाले का? राम- लक्ष्मण- सीतेबरोबर समाज उर्मिलेला भजतो का? की, घरचे काम क्षुल्लक असते असे 'महान संस्कृती' लाभलेला आपला समाज तेव्हापासून आजपर्यंत समजतो? बरेच प्रश्न अनुत्तरित राहिले आहेत; कारण हे प्रश्न आपल्यासाठी अडचणीचे ठरले आहेत...अगदी आजच्या 'जागतिक महिला दिना'पर्यंत..!
तिसरी स्त्री आहे, मंदोदरी!
मंदोदरी रावणाची पत्नी होती आणि लंकेची सम्राज्ञी होती. एवढी सत्ता आणि संपत्ती तिच्या पायाशी लोळण घेत होती. सीता अशोकवनात येईपर्यंत म्हणजे रावण तिला तिथे आणेपर्यंत तिचा बिचारीचा संसार व्यवस्थितपणे चालला होता. पण...या 'पण'ने भल्याभल्यांचा घात केला आहे. सीतेला रावणाने हातही लावला नाही हे मान्य; पण सीतेला पळवून आणल्यापासून तो अस्वस्थ होता हे कोणीच नाकारणार नाही. आपल्या स्वतःच्या महालाबाहेर एका 'परस्त्री'ला आपला पती आणून ठेवतो आणि तिला लग्नाची मागणी घालतो, हे एक पतिव्रता स्त्री (मंदोदरी) कशी काय सहन करू शकते? कहर म्हणजे, त्या 'परस्त्री'ची काळजी घेण्याची आज्ञा तिचा पती रावण तिला करतो. राजकारण असो किंवा अन्य काहीही... एका पतिव्रतेने आपल्या पतीचे हे वर्तन का मान्य करावे? एवढेच नव्हे तर, रावणाचे आपल्या एका दासीबरोबर संबंध असून तिच्यापासून त्याला एक पुत्रही होता. पण, त्या पुत्राचा तो मनस्वी तिरस्कार करायचा. (म्हणजे, शय्यासोबतीसाठी त्याला एक स्त्री चालत होती; पण तिला स्वतःपासून झालेला मुलगा त्याला नको होता!) मंदोदरीचे दुःख एक स्त्री म्हणून आपण समजू शकतो. स्वतः एका आदर्श पत्नीचा भूमिका वठवत असताना आणि स्वतःला पुत्रप्राप्ती झाली असूनही आपला पती 'परस्त्रियां'च्या मागे लागल्यामुळे आपल्याकडे दुर्लक्ष करतो हे तिने कसे सहन केले असेल? आणि, इतके सहन करूनही समाजाने 'एक स्त्री' म्हणून किती दखल घेतली? आजच्या 'जागतिक महिला दिनी' तरी तिच्या मानसिक आणि सामाजिक वेदनेची आपण दखल घेतली पाहिजे असे मला वाटते.
आणखी दोन दखलपात्र उदाहरणे म्हणजे, महाभारतातील पांडवपत्नी द्रौपदी आणि श्रीकृष्णाची पत्नी रुक्मिणी!
द्रौपदी खरे तर द्रुपदाला अनपेक्षितपणे मिळाली होती. म्हणजे त्याने शत्रूचा बदला घेण्यासाठी एका पुत्राची प्राप्ती व्हावी अशी प्रार्थना केली होती. पण, त्या यज्ञवेदीतून तिचा भाऊ दृष्टद्युम्न याच्या प्रकटनानंतर द्रौपदी प्रकट झाली. म्हणजे, खरेतर जन्मावेळीच ती 'नकुशी' होती. द्रौपदी अत्यंत तेजस्वी आणि शूर होती. तिचे पुढे पाच पांडवांशी लग्न झाले. पाच जणांची पत्नी होणे हेच मानसिकदृष्ट्या वेदनादायक नसेल का? असो. खरी समस्या पुढे आहे. ती पाच जणांची पत्नी झाली तरी प्रत्येकी एका वर्षासाठी ती एका- एका पांडवाबरोबर राहणार होती. जेव्हा ती पांडवांपैकी एका भावाबरोबर वर्षाचा कालावधी घालवून दुसऱ्या भावाकडे रहायला जात असे त्यावेळी तिचे कौमार्य तिला परत मिळवावे लागत असे. कौमार्य आणि शुद्धता प्राप्तीसाठी तिला अग्निदिव्य पार पाडावे लागत असे. याचा अर्थ, पाच पती असण्याचा जो काही त्रास व्हायचा तो पुरुषांना न होता, द्रौपदीलाच व्हायचा. वैशिष्ट्य म्हणजे, ज्या पतीकडून द्रौपदी निघून जायची त्याच्याकडे ती परत येण्यासाठी चार वर्षे लागत असत आणि या चार वर्षांच्या कालावधीमध्ये तो प्रत्येक पांडव आपल्या दुसऱ्या पत्नीच्या सान्निध्यात रहायचा. म्हणजेच, जी काही बंधने होती ती द्रौपदीलाच...पांडव मात्र बंधनमुक्त होते.
द्रौपदीची व्यथा एवढ्यात संपेल तर आश्चर्य! कारण, इतके 'बंदिनी'चे जीवन जगूनही तिची किंमत युधिष्ठिराने जुगारात लावण्याच्या एका सामान्य वस्तूएवढीच केली. राज्यासह सर्व संपत्ती हारल्यावर धर्मराज युधिष्ठिराला आपल्या पत्नीला द्युतात द्यायला काहीच वाटले नाही. पतीने पत्नीचे संरक्षण करावे, इतकी माफक अपेक्षाही हे पांडव पूर्ण करू शकले नाहीत. आणि, अखेरीस आपण त्यांनाच आपल्या धर्माचे रक्षक मानतो, आदर्श मानतो. दुर्योधनाने देखील पांडवांविरुद्धच्या आपल्या सत्तालढाईचा वचपा द्रौपदीचेच वस्त्रहरण करू काढला. भर सभेत एका स्त्रीला निर्वस्त्र करणे ना दुर्योधनाला लज्जास्पद वाटले ना भीष्म, द्रोण, कृपाचार्य आणि पांडवांना! आणि, ज्यांना वाटले त्यांनी ते थांबविण्यासाठी काहीच केले नाही. म्हणजे, एकूणच द्रौपदी ही तिच्या आयुष्यात दीर्घकाळ एखाद्या निर्जीव वस्तूसारखी वागवली गेली.
आजच्या जागतिक महिला दिनानिमित्त तिच्याही मानसिकतेचे स्मरण व्हावे.
यापाठोपाठ मी रुक्मिणीचा उल्लेख करू इच्छितो. रुक्मिणी ही साक्षात श्रीकृष्णाची सर्वांत लाडकी आणि अग्रमानाची भार्या. तशा तर कृष्णाला सोळा सहस्र बायका होत्या असे महाभारतात म्हटले आहे. एका पुरुषाशी विवाहबंधनात अडकलेल्या इतक्या पत्निरुपी स्त्रिया ही गोष्ट पुरुषांच्या प्रती असणारी स्त्रीची किंमत दर्शवत नाही का? रुक्मिणी, सत्यभामा सोडल्या तर कृष्णाच्या इतर पत्नींची नावेदेखील कुणाला माहिती नसतात. असो. रुक्मिणीचे कृष्णावर अपरंपार प्रेम होते. आणि, त्याहूनही जास्त प्रेम राधेचे श्रीकृष्णावर होते. श्रीकृष्णाचेही राधेवर अजोड प्रेम होते. असे असताना सोपा विचार करता राधा ही कृष्णाची पत्नी असायला हवी होती. मात्र तसे झाले नाही. कारण काहीही असो. बरे, एवढ्यावर हे थांबले नाही. श्रीकृष्णाचे (बरेच) विवाह झाले. राधेचाही विवाह झाला. आणि, तरीही दोघांचेही एकमेकांवरचे प्रेम कमी झाले नाही. ते प्रेम अतिशुद्ध होते असे आपण एकवेळ मानू. तरीही, दोघांच्याही विवाहानंतर दोघे एकमेकांना भेटत राहिले. त्यावरही बोलायचे राहू देऊ. पण, या सर्वांत रुक्मिणीचे काय? तिचेही प्रेम शुद्ध होते. महाभारतात असे काही प्रसंग आहेत जेव्हा श्रीकृष्णाच्या काही गरजा रुक्मिणी पूर्ण करू शकत नाही, म्हणून प्रत्यक्ष श्रीकृष्ण तिला राधेचे सहाय्य घ्यायला सांगतो. त्यावेळी रुक्मिणीच्या मनात उडणाऱ्या गोंधळाचे स्मरण आजच्या दिवशी तरी आपण करायला नको का? आपण आपल्या पतीची एकनिष्ठ पत्नी असूनही त्याचे सर्वोच्च प्रेम आपल्या पदरी पडत नाही, या विचाराने तिच्या मनाला ज्या वेदना झाल्या असतील, त्याचे काय? तो विचार आपण आज तरी करतो का? आणि, करत नसू तर, का करत नाही? आजच्या काळात एखाद्या पुरुषाने असे वागलेले आपण स्वीकारू का?
असे म्हणतात की, राम त्याच्या आयुष्यात कधी हसला नाही आणि श्रीकृष्ण त्याच्या आयुष्यात कधी रडला नाही...परंतु, मग सतत अवहेलनाच वाटी आलेल्या सीता, उर्मिला, द्रौपदी, मंदोदरीचे काय? त्या हसल्या की रडल्या? आणि, सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, तत्कालीन समाज त्यांच्यावर हसला की त्यांच्यासाठी रडला?
धर्म कोणताही घ्या. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन किंवा शीख किंवा अन्य कोणताही. त्या-त्या धर्माच्या सर्वोच्चपदी देव किंवा प्रेषित आहेत; देवी किंवा प्रेषिता नाही. हिंदूचे ब्रह्मा- विष्णू- महेश, मुस्लिमांचे मोहम्मद पैगंबर आणि ख्रिश्चनांचा येशू...देवी कुठे आहेत? त्यांची नावे सतत कोणत्या ना कोणत्या देवाशी जोडली गेलेली आढळतात. शंकर- पार्वती, विष्णू- लक्ष्मी वगैरे वगैरे. यात कोणताच धर्म पुढे नाही. देवदेवता अस्तित्वात होते की नाही हे माहिती नाही; पण ही जर प्रतिके असतील तर ती समाजाच्या पुरुषी मानसिकतेचेच प्रतिनिधित्व करत नाहीत का?
आजच्या स्त्रीच्या व्यथाही काही वेगळ्या नाहीत. काळ बदलला, युगे बदलली...पण, स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन आपण बदलला का?
इतके आधुनिकीकरण आणि कैक वर्षांच्या प्रगतीनंतरही आपण स्त्रीला उपभोग्य 'वस्तू' मानणे बंद करू शकलो आहोत का?
काम करणाऱ्या स्त्रीच्या कामाची दखल तरी घेतली जाते, तिच्या कर्तृत्वाची उंची मोजली जाते. पण, घरकाम करणाऱ्या स्त्रीचे काय? ती अजूनही housewife बनूनच जगते आहे. तिला आपण मानाचा homemaker चा दर्जा कधी देणार? नवरे पैसे कमावतात; पण त्याचे सुयोग्य व्यवस्थापन बायकाच करू जाणे!
'यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता!' असे म्हटले जाते. खरेतर मी म्हणेन, स्त्रीला देवी बनवून तिला देव्हाऱ्यात कोंडू नका. तिला तिचे जीवन तिच्या निर्णयाने जगू द्या. तिला उमलू द्या आणि फुलू द्या. तिच्या आंतरिक सामर्थ्यावर पूर्ण विश्वास ठेवा.
महिलांना सन्मानाने वागवायचे ठरवून आपण 'जागतिक महिला दिना'निमित्त त्यांना शुभेच्छा देऊया!!!
(©डॉ.अमित सुमन तुकाराम पाटील)
(©या लेखाचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत.)
(केवळ वॉट्स अॅप संपर्कासाठी- ७८८७५६९६९९)
सीता, द्रौपदी, राधा चर्चिल्या तरी गेल्या; पण उर्मिला, मंदोदरी, रुक्मिणीचे काय?
(©डॉ.अमित सुमन तुकाराम पाटील)
(©या लेखाचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत.)
(केवळ वॉट्सअॅप संपर्कासाठी- ७८८७५६९६९९)
दरवर्षी ८ मार्चला आपण सगळे 'जागतिक महिला दिन' साजरा करतो. असाच एखादा दिवस 'जागतिक पुरुष दिन' बहुधा नसतो. याचे कारण स्पष्ट आहे की, मानवी जीवनाच्या उत्पत्तीपासून पुरुष कर्तृत्व गाजवणार आणि महिला 'चूल आणि मूल' या गोष्टींच्या बाहेर पडणार नाहीत हे जगातल्या सर्व आधुनिक संस्कृतींनी आणि धर्मांनी जणू गृहीतच धरले होते.
आणि म्हणून, आत्ता गेल्या शंभर- सव्वाशे वर्षांत स्त्रिया घराबाहेर पडून विविध क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवू लागल्या आहेत यासाठी 'जागतिक महिला दिन' साजरा केला जातो.
मानवी मानसिकतेची ही मूलभूत आधाररेखा समजून घेतली गेली पाहिजे. युगानुयुगे कर्तृत्व गाजविण्याचे काम by default पुरुषच करतात, ही ती मानसिकता!
कदाचित या क्षणाला माझा विचार चुकीचा किंवा हास्यास्पद वाटेल; पण माझे मत असे आहे की, खरे तर स्त्रियांनी जीवनाच्या सर्व महत्त्वपूर्ण क्षेत्रांत इतकी प्रगती करावी की मग त्यांच्या कर्तृत्वाला सलाम करण्यासाठी विशेष 'महिला दिना'ची आवश्यकता वाटू नये. इतके त्यांचे अस्तित्व मानवी जीवनात सामान्य व्हावे!!!
अगदी पुराणकाळापासून स्त्रीने करावयाची कामे आणि पुरुषाने करावयाची कामे अशी विभागणी केली गेली. पहिल्यांदा ही विभागणी शारीरिक वैशिष्ट्यांना अनुसरून करण्यात आली होती. मात्र हळूहळू हे एक बंधन ठरत गेले. शारीरिक वैशिष्ट्यांवर आधारित झालेली नैसर्गिक व्यवस्था नंतर समाजाच्या मनोवस्थेचा पाया ठरत गेली.
खूप अनोळखी उदाहरणे घ्यायला नकोत. आपल्या काही महाकाव्यातील उदाहरणांबद्दल मला अगदी थोडेसे बोलायचे आहे. या उदाहरणांमधून पुरूष आणि स्त्रीच्या मनातील पारंपारिक पुरुषी मानसिकतेच्या वर्चस्वाचा विचारानुभव घेता येईल.
सीतेचा त्याग मान्य झाला आहे आणि पुरुषी मानसिकतेने स्त्रीवर सातत्याने केलेल्या अन्यायाचे प्रतीक म्हणून सीतेकडे पाहण्याचा आधुनिक दृष्टिकोन आहे. पण, मी फक्त सीतेबद्दल बोलून थांबू इच्छित नाही. मला इथे तीन महिलांबद्दल बोलायचे आहे.
पहिली अर्थातच आहे, सीता.
सीता हे स्त्रीच्या बुद्धिमत्ता, चातुर्य, शौर्य, स्वाभिमान आणि त्यागाचे मूर्तिमंत नाव बनून गेले आहे. आणि, तिचा पती राम हा आदर्श राजा म्हणून अखंड भारतवर्षात इतका प्रसिद्ध आहे की, चांगल्या पद्धतीने केल्या जाणाऱ्या राज्यकारभाराला आता 'रामराज्य' या त्याच्याच नावाने ओळखले जाते. आणि, रावण मात्र बुद्धिमान आणि शूर असूनही तो केवळ रामाचा शत्रू म्हणूनच जास्त (कु)प्रसिद्ध झाला आहे.
राज्यकर्ते म्हणून राम आणि रावण यांच्याबद्दल आपण बरे- वाईट बोलू शकतो. परंतु, एक पती म्हणून आपण त्यांची कशी तुलना करणार?
राम-रावण युद्ध सुरू असताना रावणाची पत्नी मंदोदरीवर शत्रूसैन्यातील काही सैनिकांनी बलात्कार केला. रावणाला ही बातमी कळाली तेव्हा तो दुःखी आणि उद्विग्न झाला. तो कालखंड असा होता की, बलात्कार तर खूप लांबची गोष्ट झाली, साधे एखाद्या स्त्रीकडे बघणेही गंभीर गुन्हा मानला जायचा. अशा सामाजिक परिस्थितीत लंकाधीश रावणाच्या पत्नीवर- लंकेच्या सम्राज्ञीवर- बलात्कार झाला होता. अगदी आजच्या काळातही बलात्कारित स्त्रीवर सामाजिक बहिष्कार टाकला जातो. तो काळ तर टोकाच्या सामाजिक रुढींच्या पालनाचा होता. तरीही, रावणाने मंदोदरीला अव्हेरले नाही. तो तिच्याजवळ पोहोचला. तिच्या उघड्या कायेवर वस्त्र टाकले आणि तिला आपल्या रथात बसवून महालात घेऊन आला. रावण लंकानरेश होता. त्याने विचार केला असता तर, तो मंदोदरीला त्याच अवस्थेत सोडून निघून जाऊ शकला असता. त्याच्या राज्यात कुणीही त्याला प्रबळ विरोध करणे शक्य नव्हते. तरीही, त्याने मंदोदरीला स्वतः जाऊन रथातून राजवाड्यात आणले. रावणाने एक पती म्हणून असणारे त्याचे कर्तव्य पूर्ण केले.
याउलट, मला रामाचे उदाहरण वाटते. सीतेच्या चारित्र्याबद्दल सीतेला आणि रामाला पूर्ण खात्री असूनही एका संकुचित मनोवृत्तीच्या धोब्याचा आक्षेप ग्राह्य मानून त्याने सीतेला अग्निपरीक्षा द्यायला भाग पाडले. हे करताना सीतेच्या मनातील वेदनांचा मात्र ना रामाने विचार केला ना रामराज्यातील जनतेने. स्वतःच्या 'आदर्श आणि मर्यादापुरुषोत्तम' या प्रतिमांची चाचणी करण्यासाठी रामाने सीतेला अग्निपरीक्षेचे दिव्य पेलायला सांगितले.
मग, येथे एक पुरुष आणि पती म्हणून राम योग्य ठरतो की रावण?
दुसरी स्त्री म्हणजे, उर्मिला!
उर्मिला ही लक्ष्मणाची पत्नी. तोच हा लक्ष्मण ज्याने आपल्या भावाच्या सेवेत अडथळा नको आणि आपल्या आईची काळजी कोणीतरी जबाबदारपणे काळजी घ्यायला हवी म्हणून आपली पत्नी उर्मिला हिला आपल्याबरोबर येऊ दिले नाही. लक्ष्मणाचे हेतू उच्च दर्जाचे होते यात मुळीच शंका नाही आणि त्यासाठी आपण रामाबरोबर लक्ष्मणाचीही पूजा करतो. भारतात जी काही रामाची मंदिरे आहेत त्यात 'दक्षिणे लक्ष्मणो यस्य', म्हणजे 'ज्याच्या उजव्या बाजूला लक्ष्मण आहे' असे खुद्द रामाचे वर्णन आहे इतका तो पूजनीय आहे. परंतु, या 'राम, लक्ष्मण, जानकी' मध्ये 'उर्मिला' कुठे आहे? भाऊ म्हणून लक्ष्मण सर्वश्रेष्ठ आहे; पण 'पती' म्हणून लक्ष्मण किती श्रेष्ठ आहे? यातील विचार करण्याची गोष्ट म्हणजे, 'मर्यादा पुरुषोत्तम आणि आदर्श राजा' म्हणून रामाचे, 'त्यागाचे मूर्तिमंत प्रतीक' म्हणून सीतेचे आणि 'सर्वश्रेष्ठ भाऊ' म्हणून लक्ष्मणाचे कौतुक करताना या कर्त्या स्त्री- पुरुषांच्या पाठीमागे त्यांचे घर यशस्वीरीत्या सांभाळणारी 'उर्मिला' आपल्या कधी ध्यानीमनी तरी येते का? घरातील ज्येष्ठ सून वनवासात असताना आणि ज्याची ती 'अर्धांगिनी' आहे असा पती लक्ष्मण तिच्या बरोबर नसताना तिने सूनेची जी कर्तव्ये पार पाडली त्याचा हिशोब आपण कधी करणार? काही काव्यात असे म्हटले जाते की, लक्ष्मण वनवासात राम- सीतेचे रक्षण करण्यासाठी सलग चौदा वर्षे न झोपता जागा राहण्याची प्रतिज्ञा करतो. परंतु, लक्ष्मण निसर्गनियमाविरुद्ध असा वागू शकत नाही असे 'निद्रादेवी' त्याला बजावते. त्यावर, 'माझी निद्रा तू माझ्या पत्नीकडून पूर्ण करून घे' अशी विनंती लक्ष्मण निद्रादेवीला करतो. अशा एका आख्यायिकेच्या आधारे उर्मिला चौदा वर्षे झोपून राहिली, ज्याला 'उर्मिला निद्रा' असे म्हणतात.
आता विचार करा...इथेही बळी उर्मिलेचाच! लक्ष्मण जर चौदा वर्षे सलग जागून निसर्गनियमाविरुद्ध जाऊ शकत नसेल तर त्याची पत्नी 'उर्मिला' सलग चौदा वर्षे झोपून त्या नियमाविरुद्ध कशी काय जाऊ शकते? किंवा, स्पष्टच बोलायचे तर हे चुकीचे काम करण्यासाठी लक्ष्मण कशाच्या आधारावर उर्मिलेची निवड करतो?
मग, गृहकर्तव्य असो वा 'उर्मिलानिद्रा', उर्मिलेला तिच्या त्यागाएवढे महत्त्व मिळाले का? राम- लक्ष्मण- सीतेबरोबर समाज उर्मिलेला भजतो का? की, घरचे काम क्षुल्लक असते असे 'महान संस्कृती' लाभलेला आपला समाज तेव्हापासून आजपर्यंत समजतो? बरेच प्रश्न अनुत्तरित राहिले आहेत; कारण हे प्रश्न आपल्यासाठी अडचणीचे ठरले आहेत...अगदी आजच्या 'जागतिक महिला दिना'पर्यंत..!
तिसरी स्त्री आहे, मंदोदरी!
मंदोदरी रावणाची पत्नी होती आणि लंकेची सम्राज्ञी होती. एवढी सत्ता आणि संपत्ती तिच्या पायाशी लोळण घेत होती. सीता अशोकवनात येईपर्यंत म्हणजे रावण तिला तिथे आणेपर्यंत तिचा बिचारीचा संसार व्यवस्थितपणे चालला होता. पण...या 'पण'ने भल्याभल्यांचा घात केला आहे. सीतेला रावणाने हातही लावला नाही हे मान्य; पण सीतेला पळवून आणल्यापासून तो अस्वस्थ होता हे कोणीच नाकारणार नाही. आपल्या स्वतःच्या महालाबाहेर एका 'परस्त्री'ला आपला पती आणून ठेवतो आणि तिला लग्नाची मागणी घालतो, हे एक पतिव्रता स्त्री (मंदोदरी) कशी काय सहन करू शकते? कहर म्हणजे, त्या 'परस्त्री'ची काळजी घेण्याची आज्ञा तिचा पती रावण तिला करतो. राजकारण असो किंवा अन्य काहीही... एका पतिव्रतेने आपल्या पतीचे हे वर्तन का मान्य करावे? एवढेच नव्हे तर, रावणाचे आपल्या एका दासीबरोबर संबंध असून तिच्यापासून त्याला एक पुत्रही होता. पण, त्या पुत्राचा तो मनस्वी तिरस्कार करायचा. (म्हणजे, शय्यासोबतीसाठी त्याला एक स्त्री चालत होती; पण तिला स्वतःपासून झालेला मुलगा त्याला नको होता!) मंदोदरीचे दुःख एक स्त्री म्हणून आपण समजू शकतो. स्वतः एका आदर्श पत्नीचा भूमिका वठवत असताना आणि स्वतःला पुत्रप्राप्ती झाली असूनही आपला पती 'परस्त्रियां'च्या मागे लागल्यामुळे आपल्याकडे दुर्लक्ष करतो हे तिने कसे सहन केले असेल? आणि, इतके सहन करूनही समाजाने 'एक स्त्री' म्हणून किती दखल घेतली? आजच्या 'जागतिक महिला दिनी' तरी तिच्या मानसिक आणि सामाजिक वेदनेची आपण दखल घेतली पाहिजे असे मला वाटते.
आणखी दोन दखलपात्र उदाहरणे म्हणजे, महाभारतातील पांडवपत्नी द्रौपदी आणि श्रीकृष्णाची पत्नी रुक्मिणी!
द्रौपदी खरे तर द्रुपदाला अनपेक्षितपणे मिळाली होती. म्हणजे त्याने शत्रूचा बदला घेण्यासाठी एका पुत्राची प्राप्ती व्हावी अशी प्रार्थना केली होती. पण, त्या यज्ञवेदीतून तिचा भाऊ दृष्टद्युम्न याच्या प्रकटनानंतर द्रौपदी प्रकट झाली. म्हणजे, खरेतर जन्मावेळीच ती 'नकुशी' होती. द्रौपदी अत्यंत तेजस्वी आणि शूर होती. तिचे पुढे पाच पांडवांशी लग्न झाले. पाच जणांची पत्नी होणे हेच मानसिकदृष्ट्या वेदनादायक नसेल का? असो. खरी समस्या पुढे आहे. ती पाच जणांची पत्नी झाली तरी प्रत्येकी एका वर्षासाठी ती एका- एका पांडवाबरोबर राहणार होती. जेव्हा ती पांडवांपैकी एका भावाबरोबर वर्षाचा कालावधी घालवून दुसऱ्या भावाकडे रहायला जात असे त्यावेळी तिचे कौमार्य तिला परत मिळवावे लागत असे. कौमार्य आणि शुद्धता प्राप्तीसाठी तिला अग्निदिव्य पार पाडावे लागत असे. याचा अर्थ, पाच पती असण्याचा जो काही त्रास व्हायचा तो पुरुषांना न होता, द्रौपदीलाच व्हायचा. वैशिष्ट्य म्हणजे, ज्या पतीकडून द्रौपदी निघून जायची त्याच्याकडे ती परत येण्यासाठी चार वर्षे लागत असत आणि या चार वर्षांच्या कालावधीमध्ये तो प्रत्येक पांडव आपल्या दुसऱ्या पत्नीच्या सान्निध्यात रहायचा. म्हणजेच, जी काही बंधने होती ती द्रौपदीलाच...पांडव मात्र बंधनमुक्त होते.
द्रौपदीची व्यथा एवढ्यात संपेल तर आश्चर्य! कारण, इतके 'बंदिनी'चे जीवन जगूनही तिची किंमत युधिष्ठिराने जुगारात लावण्याच्या एका सामान्य वस्तूएवढीच केली. राज्यासह सर्व संपत्ती हारल्यावर धर्मराज युधिष्ठिराला आपल्या पत्नीला द्युतात द्यायला काहीच वाटले नाही. पतीने पत्नीचे संरक्षण करावे, इतकी माफक अपेक्षाही हे पांडव पूर्ण करू शकले नाहीत. आणि, अखेरीस आपण त्यांनाच आपल्या धर्माचे रक्षक मानतो, आदर्श मानतो. दुर्योधनाने देखील पांडवांविरुद्धच्या आपल्या सत्तालढाईचा वचपा द्रौपदीचेच वस्त्रहरण करू काढला. भर सभेत एका स्त्रीला निर्वस्त्र करणे ना दुर्योधनाला लज्जास्पद वाटले ना भीष्म, द्रोण, कृपाचार्य आणि पांडवांना! आणि, ज्यांना वाटले त्यांनी ते थांबविण्यासाठी काहीच केले नाही. म्हणजे, एकूणच द्रौपदी ही तिच्या आयुष्यात दीर्घकाळ एखाद्या निर्जीव वस्तूसारखी वागवली गेली.
आजच्या जागतिक महिला दिनानिमित्त तिच्याही मानसिकतेचे स्मरण व्हावे.
यापाठोपाठ मी रुक्मिणीचा उल्लेख करू इच्छितो. रुक्मिणी ही साक्षात श्रीकृष्णाची सर्वांत लाडकी आणि अग्रमानाची भार्या. तशा तर कृष्णाला सोळा सहस्र बायका होत्या असे महाभारतात म्हटले आहे. एका पुरुषाशी विवाहबंधनात अडकलेल्या इतक्या पत्निरुपी स्त्रिया ही गोष्ट पुरुषांच्या प्रती असणारी स्त्रीची किंमत दर्शवत नाही का? रुक्मिणी, सत्यभामा सोडल्या तर कृष्णाच्या इतर पत्नींची नावेदेखील कुणाला माहिती नसतात. असो. रुक्मिणीचे कृष्णावर अपरंपार प्रेम होते. आणि, त्याहूनही जास्त प्रेम राधेचे श्रीकृष्णावर होते. श्रीकृष्णाचेही राधेवर अजोड प्रेम होते. असे असताना सोपा विचार करता राधा ही कृष्णाची पत्नी असायला हवी होती. मात्र तसे झाले नाही. कारण काहीही असो. बरे, एवढ्यावर हे थांबले नाही. श्रीकृष्णाचे (बरेच) विवाह झाले. राधेचाही विवाह झाला. आणि, तरीही दोघांचेही एकमेकांवरचे प्रेम कमी झाले नाही. ते प्रेम अतिशुद्ध होते असे आपण एकवेळ मानू. तरीही, दोघांच्याही विवाहानंतर दोघे एकमेकांना भेटत राहिले. त्यावरही बोलायचे राहू देऊ. पण, या सर्वांत रुक्मिणीचे काय? तिचेही प्रेम शुद्ध होते. महाभारतात असे काही प्रसंग आहेत जेव्हा श्रीकृष्णाच्या काही गरजा रुक्मिणी पूर्ण करू शकत नाही, म्हणून प्रत्यक्ष श्रीकृष्ण तिला राधेचे सहाय्य घ्यायला सांगतो. त्यावेळी रुक्मिणीच्या मनात उडणाऱ्या गोंधळाचे स्मरण आजच्या दिवशी तरी आपण करायला नको का? आपण आपल्या पतीची एकनिष्ठ पत्नी असूनही त्याचे सर्वोच्च प्रेम आपल्या पदरी पडत नाही, या विचाराने तिच्या मनाला ज्या वेदना झाल्या असतील, त्याचे काय? तो विचार आपण आज तरी करतो का? आणि, करत नसू तर, का करत नाही? आजच्या काळात एखाद्या पुरुषाने असे वागलेले आपण स्वीकारू का?
असे म्हणतात की, राम त्याच्या आयुष्यात कधी हसला नाही आणि श्रीकृष्ण त्याच्या आयुष्यात कधी रडला नाही...परंतु, मग सतत अवहेलनाच वाटी आलेल्या सीता, उर्मिला, द्रौपदी, मंदोदरीचे काय? त्या हसल्या की रडल्या? आणि, सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, तत्कालीन समाज त्यांच्यावर हसला की त्यांच्यासाठी रडला?
धर्म कोणताही घ्या. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन किंवा शीख किंवा अन्य कोणताही. त्या-त्या धर्माच्या सर्वोच्चपदी देव किंवा प्रेषित आहेत; देवी किंवा प्रेषिता नाही. हिंदूचे ब्रह्मा- विष्णू- महेश, मुस्लिमांचे मोहम्मद पैगंबर आणि ख्रिश्चनांचा येशू...देवी कुठे आहेत? त्यांची नावे सतत कोणत्या ना कोणत्या देवाशी जोडली गेलेली आढळतात. शंकर- पार्वती, विष्णू- लक्ष्मी वगैरे वगैरे. यात कोणताच धर्म पुढे नाही. देवदेवता अस्तित्वात होते की नाही हे माहिती नाही; पण ही जर प्रतिके असतील तर ती समाजाच्या पुरुषी मानसिकतेचेच प्रतिनिधित्व करत नाहीत का?
आजच्या स्त्रीच्या व्यथाही काही वेगळ्या नाहीत. काळ बदलला, युगे बदलली...पण, स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन आपण बदलला का?
इतके आधुनिकीकरण आणि कैक वर्षांच्या प्रगतीनंतरही आपण स्त्रीला उपभोग्य 'वस्तू' मानणे बंद करू शकलो आहोत का?
काम करणाऱ्या स्त्रीच्या कामाची दखल तरी घेतली जाते, तिच्या कर्तृत्वाची उंची मोजली जाते. पण, घरकाम करणाऱ्या स्त्रीचे काय? ती अजूनही housewife बनूनच जगते आहे. तिला आपण मानाचा homemaker चा दर्जा कधी देणार? नवरे पैसे कमावतात; पण त्याचे सुयोग्य व्यवस्थापन बायकाच करू जाणे!
'यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता!' असे म्हटले जाते. खरेतर मी म्हणेन, स्त्रीला देवी बनवून तिला देव्हाऱ्यात कोंडू नका. तिला तिचे जीवन तिच्या निर्णयाने जगू द्या. तिला उमलू द्या आणि फुलू द्या. तिच्या आंतरिक सामर्थ्यावर पूर्ण विश्वास ठेवा.
महिलांना सन्मानाने वागवायचे ठरवून आपण 'जागतिक महिला दिना'निमित्त त्यांना शुभेच्छा देऊया!!!
(©डॉ.अमित सुमन तुकाराम पाटील)
(©या लेखाचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत.)
(केवळ वॉट्स अॅप संपर्कासाठी- ७८८७५६९६९९)
उत्तम लेख अमितदा!! समाज्याच्या अश्या दुर्दैवी पुरुषसत्ताक मानसिकतेचे मूळ कुठतरी पौराणिक भाकडकथांमध्ये गवसते. अन् जोवर या काल्पनिक भूतकाळाला प्रमाण मानणे बंद नाही होणार, समाजमनातला बदल अशक्यप्राय वाटतो.
ReplyDeleteखूपच विचार करण्याजोगा लेख.. स्त्रियांचा सोशिकपणा त्यांचा प्रत्येक वेळी अंत बघणारा ठरला याहून दुर्दैव नाहीच आणि अजूनही हेच चालू आहे हे वाईटच.. डोळ्यात अंजन घालणारा लेख
ReplyDelete