काय लिहू मी? (विषय सुचत नसताना) About what should I write?
काय लिहू मी? (विषय सुचत नसताना)
एप्रिल २०१८ मध्ये मला एम. डी. ला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाला. पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणाच्या पहिल्या वर्षात जेवायला आणि अंघोळीलाही वेळ मिळत नाही इतके आम्ही व्यस्त असतो हे बऱ्याच जणांना माहिती असेलही! त्यामुळे इथे आल्यावर पुढील तीन वर्षांपैकी किमान दीड वर्षे तरी मला काही लिहायला वेळ मिळणार नाही हे मला माहिती होते. झालेही तसेच. मी काहीच लिहू शकलो नाही. पण, बऱ्याच जणांचे मला मेसेज येऊ लागले की, ‛सर, बरेच दिवस झाले, तुमचे नवीन लेख काही वाचायला मिळालेले नाहीत. काहीतरी लिहा.’ माझ्याही मनात तीव्र इच्छा होती; पण लेखाचा विषय काय असावा हा विचार करण्याइतपतही वेळ मिळत नव्हता.
दिवस असेच जात असताना परत एकदा दैवाने माझ्या बाजूने फासे टाकले. माझे पोस्टिंग किमान एक महिन्यासाठी शासकीय कर्करोग रुग्णालयात लावण्यात आले. इथे वैद्यकीय महाविद्यालयापेक्षा त्यामानाने कामाचा ताण थोडासा कमी असतो. इथे असताना स्वतःसाठी किमान अर्धा तास काढता येतो हे विशेष! (युनिट वाढत जाईल तसतशी पुढच्या एखाद्या महिन्यात इथेही मोठी गर्दी होणार आहेच!).तर...या रुग्णालयात विशेष नियुक्ती होणारे आम्ही (मी आणि माझे सहकारी) पहिलेच रेसिडेंट डॉक्टर्स! तसा आनंदाचा क्षण, पण धाकधुकीचाही. कर्करोग झालेली लहान मुले रोज पाहणे, तपासणे आणि त्यांच्यावर औषधोपचार करणे हे नेमून दिलेले काम...पण, त्या निरागस फुलांकडे मन घट्ट करून पाहणे आणि त्यांच्या आई-वडिलांच्या भावविश्वाचा नकळत कानोसा घेऊनही आपल्या वेदनादायी भावना दाबून ठेवाव्या लागणे हे अभावितपणे लागलेले ओझे काम!
सगळे अतिशय गरीब घरातून आलेले रुग्ण, आर्थिकदृष्ट्या अतिदुर्बल आणि त्यात आजार त्यामुळे घराचे कंबरडे मोडलेले, मुलं आजारी म्हणून आईवडिलही व्यथित, मागे घराकडे बघायला कोणी नाही अशी सर्वांची अवस्था! प्रत्येक पेशंटची दर्दभरी व्यथा...तसे एखाद्या ब्लॉगसाठी चांगले विषय आहेत हे. डोळ्यांतल्या अश्रूंची किंमत फार. हे विषय वेगळ्या दृष्टिकोनातून परत कधीतरी मांडेन मी; पण सध्या कशावर लिहू?
मी राहतो त्या शहरातील अस्वच्छता, जागोजागी पसरलेले माशांचे साम्राज्य, त्यामुळे उद्भवू पाहणारी सार्वत्रिक अनारोग्याची अवस्था आणि त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर- विशेषतः शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांवर- येणारा कामाचा अतिताण हा विषय चालेल का? मग, आपल्या ‛देशाच्या एकूण आर्थिक उत्पन्नापैकी (जीडीपी) आरोग्य सेवेवर खर्च केला जाणारा निधी आणि प्रगत-अतिप्रगत देशांतील अर्थव्यवस्थांत आरोग्य सेवेवर खर्च केलेला निधी’ यांच्यातील तौलनिक अभ्यासाबाबत मी खोलात शिरून एखादा अर्थपूर्ण लेख लिहू का? काय करू? मनाचे विचार माझ्या शहरातून मला थेट जीनिव्हातल्या जागतिक आरोग्य संघटनेच्या महासचिवांच्या कार्यालयात घेऊन गेले. पण हो, मी लिहू शकतो ना याही विषयावर. मला आवडच आहे की ‛आंतरराष्ट्रीय राजकारण आणि परस्परसंबंध’ या विषयाची! मागे नाही का मी ‛ब्रेक्झिट’वर एक लेख लिहिला होता आणि एम. पी. एस. सी. करणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्याच्या प्रिंट्स काढून घेतल्या होत्या! तेव्हा मी तो लेख कॉपीराईट केला होता, पण त्याच्यावर माझा लोगो टाकायचा राहून गेला होता. पुण्यात होतो त्यावेळी मी संतोषबरोबर. संतोष, माझा चुलतभाऊ. तो मला म्हणाला होता, ‛दादा, तू कॅमस्कॅनर डाउनलोड कर. त्याच्यावर फोटो काढ आणि मग ब्लॉग अपलोड कर. मग मुलांनी प्रिंट्स काढल्या तरी तुझं नाव आणि लोगो त्यावर येईलच.’ तेव्हा मी तानाजीच्या (दुसरा चुलतभाऊ) खोलीवरून निघून स्वारगेटकडे जात होतो. आदल्या रात्रीच मी भाताण्यावरून (पालघर जिल्ह्यातील आदिवासी भागातील माझे नोकरीचे ठिकाण असलेले गाव) निघून पुण्याला आलो होतो. किती जिकिरीचा प्रवास तो. आधी ३ किमी चालत पायी प्रवास करायचा, मग ६ किमी टमटमने, मग ६ किमी एस. टी. ने, मग ११ किमी सिटी बसने वसई स्टँड गाठायचे. दुपारनंतर केवळ चार वाजताचीच एक बस असायची. मग गडबडीत ती पकडायची आणि घामेजलेला रटाळ ६-७ तासांचा पुण्यापर्यंतचा प्रवास करायचा. “बापरे! मला इतका त्रास व्हायचा!” मे, २०१४ मध्ये भाताणे प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी गट ‛अ’ या राजपत्रित पदावर मी रुजू झालो. अतिशय दुर्गम भागातले ते गाव. यायला-जायला रस्ता नाही. गावात काही व्यवस्था नाही. जवळचे हॉटेल २५ किमीवर. चहा प्यायचा तरी तीन अधिक तीन (येण्याचे-जाण्याचे) अशी सहा किमीची पायपीट. पावसाळ्यात प्राथमिक आरोग्य केंद्र पाण्याखाली जायचे आणि अत्यावश्यक सेवा असल्यामुळे ‛कसल्याही परिस्थितीत वैद्यकीय अधिकारी आणि ड्यूटीवरील कार्यरत स्टाफने मुख्यालय सोडू नये’ असे शासनाचे आदेश.
दवाखान्यात, प्रसूतिकक्षात, ओपीडीत, रुमवर एखाद्या दिवशी साप-विंचू दिसले नाहीत तर करमू नये इतकी त्यांची सवय. येणारे रुग्ण पैशांअभावी स्वतःची हेळसांड करणारे आणि त्यामुळेच आजाराच्या शेवटच्या टप्प्यात किंवा अत्यवस्थ स्थितीत येणारे. पहिल्यांदा खूप धावपळ व्हायची...खरं सांगू का, त्यांचा राग यायचा. ‛इतके दिवस घरी काय करत होता?’ असं मी विचारायचो. नंतर नंतर त्यांच्या व्यथा समजू लागल्या. वेळ जाईल तसतसा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आधी सहानुभूतीने आणि नंतर रागाने घेतला...राग त्यांच्यावरचा नव्हे, तर आपल्यावरचा-आपल्या व्यवस्थेवरचा! असो. भाताणे गावातून तानसा नावाची नदी वाहते. (तानसा धरणातून मुंबईला पाणीपुरवठा होतो. वस्तुस्थिती अशी की, त्या धरणाचे पाणी मायानगरी मुंबईची तहान जरी भागवत असले तरी, या धरणाच्या भिंतीला लागून असलेल्या गावातील लोकांना तोंड भिजवण्याइतकेही पाणी त्या धरणातून मिळत नाही. माझे पहिल्यांदा पोस्टिंग झाले ते गगनबावडा ग्रामीण रुग्णालयात; तिथलीही परिस्थिती अशीच. गगनबावडा हे महाराष्ट्राचे चेरापुंजी- सर्वाधिक पावसाचे ठिकाण. तिथे मी संपूर्ण एक वर्ष होतो. पावसाळ्यात सलग चार महिने पाऊस न उघडणाऱ्या या गावात डिसेंबर महिन्यापासूनच पोरीबाळींना डोक्यावर घागरी-हंडे घेऊन पाण्यासाठी वणवण भटकावे लागते.) पावसाळ्यात पहिल्याच मोठ्या पावसात तानसा नदीला पूर येऊन गावचा रस्ता बंद पडायचा आणि मग आम्हाला गावाबाहेर संपर्क ठेवण्यासाठी दोन तीन गावांना कच्च्या रस्त्याने वळसा घालून बाहेर पडावे लागायचे. ‛गावातून चांदिपपर्यंत मधल्या रस्त्याने थेट पूल होणार आहे’ हे मी तिथे असलेल्या जवळपास प्रत्येक वर्षी नव्याने ऐकले आहे; पण मी तिथे असेपर्यंत तरी पूल काही झाला नाही. आणि, गावातून मोठ्या रस्त्याला जोडणारा जो मुख्य रस्ता होता, तो एकतर आधीच खचला होता आणि पावसाळ्यात तर बरेच दिवस तो पाण्याखाली असायचा. पावसाळ्यातील अशा दिवसांत एखाद्या गंभीर अवस्थेतील रुग्णाला संदर्भसेवा देणे अत्यंत जिकिरीचे ठरत असे (अजूनही ठरते). दोन-तीन वेळा तर मीच रुग्णाला दुचाकीवर बसवून रस्त्यापलीकडे उभ्या राहणाऱ्या १०८ च्या रुग्णवाहिकेत नेऊन बसवलेलं मला स्पष्ट आठवतंय. गरिबांना खरंच कुणी वाली नसतो का? गरिबांच्या अंगावर कपडे नाहीत म्हणून स्वतः वस्त्रत्याग करणारे ‛गांधी’ आणि “ मोहिमेच्या वेळी गोरगरीब रयतेने पिकवलेल्या धान्याच्या एका कणसालाही धक्का लावू नका’’ असा जरबेचा दम भरणारे छत्रपती शिवाजी महाराज या दोघांचीही आज देशाला गरज असताना ते कुठे हरवले आहेत? त्यांना कसं शोधायचं बरं? आणि, समजा ते सापडलेच तर मग नवीन पिढीत गांधी आणि छत्रपती शिवाजी महाराज निर्माण न झाल्याबद्दल ते स्वतःलाच दोष देतील का?
अरे वा! महाराजांच्या स्वराज्यात आपण जन्माला आलो हे महद्भाग्यच की! मी गेल्या दोन वर्षभरात ४४ गड फिरलो. महाराष्ट्राचे सर्वोच्च शिखर असलेल्या कळसुबाईपासून ते अत्यंत कमी उंची असलेल्या बल्लाळगडापर्यंत. आपले (माणसाचे) क्षुद्र अस्तित्व ठळकपणे अधोरेखित करणारे हरिश्चंद्रगडाचा कोकणकडा, विशाळगडावरचे पठार, मलंगगडाची उंची आणि रांगण्याची भव्यता; उन्हाळ्यातही रंगीबेरंगी शीतलतेचा अनुभव देणारे टकमकगड आणि कलानिधीगड; तत्कालीन समाजातील स्त्रियांवर केल्या जाणाऱ्या अन्यायाची आठवण करून देणाऱ्या सतीशिळारुपी स्मारकांना आजही अंगाखांद्यावर वागवणारे पारगड, शिवगड, वसंतगड, विशाळगड; शिवकालीन लोकांमध्ये स्वच्छतेबाबत असणाऱ्या जागरुकतेचे आणि स्वच्छताशास्त्राचे महत्त्व अधोरेखित करून दाखवणारे भुदरगड, वसंतगड; युद्ध आणि शत्रूपासून बचाव व्हावा म्हणून अद्भुत रचना करून बांधलेले रांगणा आणि पन्हाळगड; शिवशंभूच्या पदस्पर्शाने पावन झालेला पन्हाळा; शिवाजी महाराज ज्या किल्ल्यांच्या वास्तुशांतीला स्वतः जातीने उपस्थित राहिले असे कलानिधीगड, महिपाळगड, पारगड आणि गंधर्वगड; समुद्राच्या भव्यतेलाही टक्कर देत उभे असलेले शिरगावचा किल्ला आणि केळवागड; अतिभव्य-अतिउंच विस्तीर्णतेचा कणखरपणा अंगी असूनही स्वतःच्या माथ्यावरील तलावात फुलवलेल्या कमळरुपी हळुवारपणाचा अनुभव देणारा अशेरीगड; एकाकीपणातही स्वतःचे एकमेवाद्वितीयत्व टिकवून ठेवणारा किल्ले कोहोज... चांगल्या सत्शील माणसाचा एक-एक स्वभावगुण अंगी बाणवलेले हे गडकोट आहेत की पूर्वस्मृती जपणारी खरीखुरी माणसंच आहेत ही? पुण्यवान माणसापेक्षाही पुण्यवान ते! का काय विचारताय? अरे छत्रपतींच्या पायांची धूळ आजही अंगाखांद्यावर मिरवण्याचं भाग्य जर कोणाच्या उरी दडले असेल तर ते हेच आपले गडकिल्ले नव्हेत का? बरं, हे गडकिल्ले केवळ शोभेसाठीचे नव्हते...
माझ्या राजाच्या स्वराज्याचं रक्षण करण्याचे मोठे काम त्यांनी ताठ मानेने केलेले आहे. कसा असेल तो काळ? त्याकाळातल्या स्वराज्यात पूर्वजन्मातला मी कोण असेन? राजांच्या जवळचा असेन की त्यांना मी माहितीही नसेन? काय केलं असेल मी स्वराज्यासाठी? कुठं राहत असेन? त्यावेळी मी होतो तरी का नक्की? आणि, असलोच तर महाराज बोलले असतील का कधी माझ्याशी? काय म्हणाले असतील? एखाद्या मोहिमेत त्यांनी मला सहभागी करून घेतले असेल का? काय कामगिरी दिली असेल मला? किती प्रश्न...उत्तरं मात्र कशाचीच नाहीत...कधीकधी प्रश्नांना उत्तरं न मिळणंच चांगलं ठरत असेल का? अडचणींच्या उत्तरांपेक्षा ते बरं, नाही का?
अरे हो...अडचणीचे प्रश्न तर बरेच आहेत; विचारही करायला नको असे वाटणारे- भ्रष्टाचारयुक्त भारतापासून ते आत्ता माझ्यासमोरून गेलेल्या आणि कुणीतरी पाठीत मारल्यामुळे मागचे दोन्ही पाय लुळे (काही विकसनशील देशांच्या अर्थव्यवस्थांप्रमाणे! वा, काय सुचलंय!) पडलेल्या कुत्र्याच्या hapless अवस्थेबद्दल... (बरं, hapless ला मराठीत तंतोतंत समानार्थी असणारा कोणता शब्द आहे? हा विचार जास्त नको, नाहीतर विषयांतराचेही विषयांतर व्हायचं!) भावनिक आणि मानवतेच्या दृष्टिकोनातून विचार करता कर्करोग रुग्णालयाच्या परिसरात फिरणारं ते कुत्र्याचं पिल्लू जगलं पाहिजे किंवा खरंतर जगवलं पाहिजे; पण व्यावहारिक विचार करता ते पिल्लू आता डार्विनच्या survival of the fittest या जगन्मान्य सूत्रात बसत नसल्यामुळे (आणि स्वतःच्या ताकदीवर दीर्घकाळ जिवंत राहणे त्याला शक्य नसल्यामुळे) त्याचा मृत्यू होणे हा नैसर्गिक मार्ग ठरावा.
कित्ती सोपंय ना सगळं? मग एवढा सोपा असलेला हा नियम याच कर्करोग रुग्णालयात वरच्या मजल्यावर दीर्घकाळ उपचार घेणाऱ्या त्या तीन वर्षांच्या मुलीला आपण लावू शकतो का? तिला रक्ताचा कर्करोग झाला आहे आणि तो पुढच्या स्टेजला गेलेला कर्करोग आहे. या आजारामुळे तिच्या हाडांमधील रक्त तयार करणाऱ्या पेशी निकामी झाल्या आहेत. त्यामुळे जितके दिवस तिला रक्त चढवत राहणार तितकेच दिवस तिचे आयुष्य असणार आहे. आपण रक्त चढवायचे थांबवू त्याच्या दुसऱ्या दिवशी तिचा मृत्यू होणे अटळ आहे. मग तरीही आपण तिला जगवत राहतो...आणि, माणुसकी म्हणून ते आपले कर्तव्य समजतो. ते योग्यही आहे; पण मग त्या कुत्र्याच्या पिलाचं काय? त्याच्याकडेही माणुसकीने पाहण्याइतपत आपल्यातली माणुसकी कधी प्रगल्भ होणार?
माझ्या मनातलं विचारचक्र गरागरा फिरतंय. जाऊदे. कशाला स्वतःला इतका त्रास करून घ्यायचा? गेल्या तीन युगांप्रमाणे सध्याचे हे कलियुगही कधीतरी संपणारच आहे. असाच एखादा राम, कृष्ण, शिवाजी, गांधी येईल जन्माला आणि मग परत एकदा ‘नवयुगा’ला सुरुवात होईल. हरिश्चंद्रगडावरील ‘त्या’ गुहेतील शिवलिंगाभोवती चार युगांचे निदर्शक असे चार खांब आहेत, प्रत्येक संपणाऱ्या एकेका युगाबरोबर त्यातला एकेक खांब तुटून पडतो...आता शेवटचा एकच खांब राहिलाय, तो आहे कलियुगाचा निदर्शक. तो तुटेल त्यादिवशी कलियुग संपेल अशी आख्यायिका आहे.
असं जर असेल तर मग तो लवकर तुटावा अशी (स्वार्थप्रेरित) प्रार्थना मी देवाकडे करू का? अरे बापरे! देवाचे नाव आले! मी आस्तिक आहे का नास्तिक? “माझा स्वतःवर विश्वास आहे आणि माझी स्वतःवर श्रद्धाही आहे” असं आत्मविश्वासाने (पण देवाचा थेट नामोल्लेख टाळून) मी म्हणायचं ठरवलं तर मग मी रुढार्थाने नास्तिक ठरतो का? आणि समजा, “मी माझ्याकडून मनःपूर्वक सर्व प्रयत्न केले आहेत...आता यश अपयश देवाच्या हाती” असे मी म्हणालो तर हा समाज मला अंधश्रद्ध ठरवेल का? “कोऽहं?” असं आपण स्वतःला विचारलं तर “अहं ब्रह्मास्मि” असं उत्तर आपलं आपल्यालाच देण्याइतपत कोणी ब्रह्मज्ञानी होऊ शकतो का? तसं संभवत नाही हे त्रिकालाबाधित सत्य आहे. (बापरे, मी खूपच judgemental होतोय का?!!!) तरीही आपण जन्मभर स्वतःचा ‘मी’पणा का सिद्ध करत बसतो? आपण बऱ्याच (खरंतर बव्हंशी) बाबतीत अज्ञानी आहोत याचे भान आपल्या अंगी येण्यासाठी अशा कोणत्या मोठ्या ज्ञानाची गरज आहे? तरीही नाही...जन्मभर आपला मी-पणा आपल्याला सोडता येत नाही. या अजस्त्र, अवाढव्य आणि अथांग पसरलेल्या विश्वामध्ये एका लहानशा ठिपक्याएवढेही स्थान नसणारे आपण आयुष्यभर किती ‘मी, मी, माझं...’ करत राहतो...मी, माझी गाडी, माझा बंगला, माझी बायको, माझी पोरं...दम लागून छाती फुटेस्तोवर केवळ ‘अहंपणा’ सिद्ध करण्याची धडपड! एवढं करून शेवटी काय तर ‘खाली हाथ आयें थे हम, खाली हाथ जाएँगे!’ ना चार माणसं जोडून ठेवता येतात, ना निसर्गावर प्रेम करता येते, ना कुटुंबासोबत वेळ घालवता येतो...मीपणा सोडून जरा स्वतःवर प्रेम करायला आपण शिकलं पाहिजे. स्वतःच स्वतःशी अधूनमधून कधीतरी भेटलं पाहिजे. फोटो काढून मिरवण्यापेक्षा आरशाला जरा जवळ केले पाहिजे.
काय चाललंय आज माझं? हं, माझी आजची ओपीडी संपली आहे. आज खूप पेशंट्स आले... अगदी नेहमीप्रमाणेच...लोकसंख्याच तेवढी आहे देशाची, तर यापेक्षा वेगळं काय होणार मग? कशात नसेल, पण माणसांच्या संख्येत तरी आम्ही जगात भारी आहोत. याचा गर्व करावा की खेद? लोकसंख्या नियंत्रणासाठी राष्ट्रीय कार्यक्रम राबवणारा भारत जगातील पहिला देश आणि तोच देश जगातील सर्वाधिक लोकसंख्या असणाराही देश! किती विरोधाभास! यासाठी आपण आपले कौतुक करावे की लाज वाटून घ्यावी? काहीजण देशाला ‘सर्वाधिक युवाओं का देश’ म्हणवून वैचारिक सकारात्मकता दाखवतात (की, सकारात्मकतेचा आव आणतात?!). पण, ते ही गोष्ट लक्षात घेत नाहीत की, बरोबर ४० वर्षांनी हाच देश ‘वृद्धांची सर्वाधिक संख्या’ आणि म्हणून समस्या असणारा देश ठरणार आहे. (वृद्ध लोक ही इथे समस्या नाही. देशातील लोकसंख्येतील अनुत्पादक लोकसंख्येचे एकूण लोकसंख्येशी असणारे प्रमाण वाढणे ही समस्या असते.) बरं, संततिप्रतिबंधक कायदा म्हटला की सर्वांना न चुकता संजय गांधी आठवतात. (तसेही कोणत्यातरी गांधींची आठवण न काढता आपल्या देशात बहुधा कुणाचाच दिवस जात नसावा!!!) पण, संततिनियमनाच्या कायद्याला किंवा साधनांना पहिला विरोध स्वतंत्र भारताच्या पहिल्या केंद्रीय आरोग्यमंत्री अॅनी बेझंट यांनीच केला होता हे कुणाच्या गावीही नसते. असो. आता मी लोकसंख्येवर कसा काय घसरलो मध्येच?
अरे बापरे! कशाकशाचा आणि किती म्हणून विचार करायचा? आणि, का करायचा? मी निघालोय औरंगाबादेतील प्रसिद्ध अशा ‘बरकत’ की स्टॉलवरचा चहा प्यायला.
आमखास मैदानाजवळील शासकीय कर्करोग रुग्णालयातून मी माझा इंटर्न मोहसीन पटेल याच्या गाडीवरून औरंगपुऱ्यातील बुढ्ढी लेन परिसरातून निघालोय. प्रचंड गर्दी, अस्वच्छता, गाड्यांच्या हॉर्न्सचे कर्णकर्कश्श आवाज, स्पीकर्सचे आवाज, कचरा, मटणाचे स्टॉल, कोलाहल, माणसांची भांडणे वगैरे यांच्या एकत्रित ओझ्याने दबून जाऊन जीव गुदमरल्यामुळे भारतातील बहुतेक इतर सर्व रस्त्यांप्रमाणे दबून गेलेला बुढ्ढी लेनचा हा रस्ता. (भारतातील रस्त्यांची अ(ना)वस्था आणि विकास हा माझ्या आणखी एखाद्या ब्लॉगचा विषय होईल इतकी मला खात्री आहे.) बरं, बरं...रस्त्याबद्दल बोलायचं नाहीये मला. तुमच्या लक्षात येतंय का? औरंगाबाद, औरंगपुरा, आमखास, बुढ्ढी लेन, बरकत आणि मोहसीन...सगळे कसे हिरव्या रंगाच्या रक्ताचा वारसा सांगणारे (!)... मी अमित पाटील, हिंदू, खानदानी ९६ कुळी मराठपणाचा वारसा सांगणाऱ्या सळसळत्या भगव्या रंगाच्या रक्ताचा! तरीही केवळ दोन-चार दिवसांपूर्वी धार्मिक दंगल झालेल्या औरंगाबाद शहरातील मुस्लिमबहुल वस्तीतील रस्त्यावरून मोहसीनच्या गाडीवरून जाताना मला जराही असुरक्षित वाटत नाहीये. काही चुकतंय का माझं? इतकं रोज ऐकतो हिंदू-मुस्लीम भांडणांबद्दल. काश्मीर प्रश्नाबद्दल. भारत-पाकिस्तान संबंधांबद्दल. माझा पहिला मित्र पैगंबर (थेट देवच- पैगंबर!). नंतर पाटील, कुलकर्णी, मुल्ला, शिंदे, खराटे, पालकर वगैरे. पण, मैत्रीत कधीच बाधा आली नाही. मुळात कुठल्याही मित्राच्या धर्म-जातीबद्दल कधी विचारच करावा लागला नाही. गावाकडे मुस्लिम मित्रांच्या घरी दिवाळीला लाडू-चकल्या-करंज्या केलेल्या मी लहानपणापासून पाहिले आहे. आणि, आम्ही त्यांच्या घरी ईदच्या सणाला हक्काने शिरकुर्माही खाल्लेला आहे. माझ्या एका मित्राचे ठरत आलेले लग्न त्याच्या घराच्या देवळीत असणाऱ्या ताईबाईच्या एका लहानशा मुर्तीला काढायला त्याच्या वडिलांनी नकार दिल्यामुळे मोडलेले मी पाहिले आहे. महाराष्ट्रात किंवा देशात इतरत्र कितीही मोठ्या हिंदू-मुस्लीम दंगली झाल्या तरी माझ्या किंवा माझ्या मामांच्या गावात त्यासाठी पोलिस बंदोबस्त लावलेला मी पाहिलेले नाही किंवा लावला गेला होता असे मी माझ्या वडिलांकडून किंवा आजोबांकडूनही कधीही ऐकलेले नाही.
आम्हाला आमच्या रक्ताचा फक्त लाल रंगच माहिती आहे...बाकी, प्रश्न राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय होईपर्यंत त्या रक्ताच्या भगव्या, हिरव्या, निळ्या रंगांचा विचारही मनाला शिवत नाही. भारताच्या फाळणीला गांधी जबाबदार होते आणि त्यांनी मुस्लिमांचे लांगुलचालन केले असा तथ्यहीन प्रचार करणारे लोक आज मोठ्या संख्येने आढळतात. स्वतःचे वाचन आणि अभ्यास नसल्यामुळे म्हणा किंवा काही वेगळ्या विचारांचा प्रभाव असल्यामुळे म्हणा, आज जगाला वंदनीय असणारे गांधी आपल्याच देशात केवळ नोटांवरच्या फोटोंपुरते मर्यादित झाले आहेत. राष्ट्रपुरुष ठरलेले लोक आपल्या देशात विशिष्ट समुहांपुरते मर्यादित केले गेल्याचे चित्र हतबलतेने आपणास पहावे लागत आहे. याच मानसिकतेतून गांधी-नेहरू काँग्रेसपुरते, बाबासाहेब दलितांपुरते, छत्रपती शिवाजी-संभाजी महाराज मराठ्यांपुरते, सावरकर हिंदुत्ववाद्यांपुरते संकुचित करून ठेवल्याचे पाप आपल्या भाळी आपण लावून घेतले आहे. आता त्याच गाडीवरून मी माझ्या रुग्णालयाकडे परततोय. निदान आपली रुग्णालये तरी आजही जात-धर्मनिरपेक्ष काम करताहेत हेही नसे थोडके! भारतासारख्या खंडप्राय देशाचे ऐक्य आता इतके आजारी पडले आहे की, केवळ रुग्णालये हीच शब्दशः त्याच्या उपचाराचे एकमेव ठिकाण होऊन बसले आहे.
मी आता परत निघालोय. अरेरे, मला समोर काय दिसतंय हे? कचऱ्याचे मोठाले ढीग! अहो, ते आश्चर्यजनक नाहीये माझ्यासाठी.
त्या ढिगाजवळची ती दोन माणसे. त्यांनी माझ्या डोक्यात मुंग्या आणल्या. ती दोन माणसं- पुरूष. एक साधारण विशीतला, दुसरा चाळिशीतला. काय करत होते ते दोघे? तर कचऱ्यातून शोधून शोधून लोकांनी कधीतरी टाकून दिलेले काही पदार्थ ते बाहेर काढत होते. आणि, मग त्याच ढिगाच्या काठावर बसून ते ते खात होते. किती हा दैवदुर्विलास! गरजेपेक्षा जास्त झाले आहेत म्हणून आपण थेट कचऱ्यात टाकून दिलेले अन्नपदार्थ. अन्न तेच, पण थोडक्याच वेळात किती संदर्भ बदलले!! पोटाच्या वर बांधता येत नाहीत म्हणून टाकलेले तेच अन्न पोटात ढकलायलाही काहीच नाही म्हणून वापरले जात होते. पूर्वी कधीतरी अन्नसुरक्षा वगैरे शब्द ऐकल्याचे, त्याबद्दल काहीतरी वाचल्याचे संदर्भ आठवले. कोठे गेली अन्नसुरक्षा? शासकीय गोदामात सडणाऱ्या हजारो क्विंटल धान्याचे काय? असे किती लोक अक्षरशः इतरांनी फेकलेल्या तुकड्यांवर जगताहेत? २५ तारखेला माझा वाढदिवस झाला. नवीन झालेल्या मित्रांनी तो साजरा करण्याचा आग्रह धरला आणि त्यांनीच केकही आणला. केक कापल्यावर त्यातल्या काहीजणांनी तो माझ्या चेहऱ्यावर लावण्याचा प्रयत्न केला. मी त्याला स्पष्ट शब्दांत नकार दिला. आणखीन दोघांनी माझा विचार उचलून धरला. “खायचा पदार्थ आणि अंगाला लावायची वस्तू” यांतला फरक न कळण्याइतपत आपले मानसिक आणि सामाजिकही अधःपतन झालंय का? कचऱ्याच्या ढिगाऱ्यावरचे अन्न खाणारे ते दोघे पाहिल्यावर माझ्या वाढदिवसादिवशी मी माझ्या विचारांवर ठाम राहिल्याबद्दल माझाच मला अभिमान वाटू लागलाय. २१ व्या शतकात महासत्ता बनण्याची स्वप्ने पाहणारे आपण (काहीजणांनी तर भारत महासत्ता बनली असल्याचे जाहिरही केलंय!) सत्यापासून अजून किती दूर आहोत हे पाहण्याची गरज आहे. देशातील जनतेचे दारिद्र्य पाहून स्वतःच्या अंगावरील वस्त्रांचा त्याग करणारा महात्मा याच देशात जन्माला आला होता हे वैशिष्ट्य! आणि, आता परत गांधीजी भारतातच जन्माला आले तर त्यांना आणखी एकदा वस्त्रत्याग करून फकिरी करायला लावण्याइतपत गेल्या ७० वर्षांत आपण केलेली प्रगती...खरंच खंत वाटण्याजोगी परिस्थिती! स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतरही अन्न, वस्त्र, निवारा याच आपल्या जनतेच्या मूळ गरजा राहणे हे महासत्ता बनू पाहणाऱ्या देशाचे निश्चितच वैशिष्ट्य असू शकत नाही. आजही आपण रस्ता, पाणी आणि वीज या मुद्द्यांशिवाय निवडणुका लढवू शकत नाही हे सत्य!
महासत्ता बनण्यासाठी मोठी सैन्यदले, लढाऊ विमाने, युद्धनौका, रणगाडे आवश्यक आहेतच. कैक दशकांतून कधीतरी एखाद्या वेळेस होणाऱ्या युद्धासाठी आपण इतकी तयारी करतो, पण अगदी रस्त्यांपासून ते सरकारी कार्यालयांपर्यंत आणि पाण्यापासून (खरेतर, शुद्ध हवेपासूनच लढाईची सुरूवात होते. आठवा, दिल्लीतील प्रदूषण!) ते पोटभर अन्नापर्यंत क्षणोक्षणी आणि पदोपदी जनतेला लढाव्या लागणाऱ्या लढाईचं काय? त्यातून आपण कधी मुक्त होणार? दक्षिण मुंबईत राहणाऱ्या ‘भारतीय’ नागरिकांना आपल्या भागाबाहेरही आपला देश आहे आणि तिथे आपलेच भारतीय बंधू-भगिनी राहतात याची कल्पनाच नाही. त्यांना अजूनही इंग्रजांची राजवटच भारतावर हवी होती असे वाटते, इतकेच ते भारतीय आहेत. भारतीयत्वाची आन-बाण आणि शान असणारा तिरंगा स्वातंत्र्यदिनी सामूहिक राष्ट्रगीत गायनासह आपल्यापासून केवळ ५० फुटांवर फडकावला जात असताना, आपल्या आयुष्यातील केवळ ५२ सेकंदही न देऊन त्याचा सरळसरळ अपमान करणारे दक्षिण मुंबईकर मी बऱ्याचदा पाहिले आहेत...त्यांनाही आपण आपले भारतीय बांधव मानतो हा आपला मोठेपणाच...बाकी, आधार, पॅनकार्ड आणि पासपोर्ट ही कागदपत्रे आणि त्यांचा व्यवसाया यांशिवाय त्यांचा त्यांच्या आयुष्यात भारताशी साधारणतः काही संबंध येत असावा असे मला प्रामाणिकपणे वाटत नाही. महासत्ता व्हायचं तर २१ व्या शतकात ‘हार्ड’ पॉवरबरोबर ‘सॉफ्ट पॉवर’ही विकसित करावी लागते. साहित्य, कला, क्रिडा, शास्त्रांचा अभ्यास यांचा समावेश सॉफ्ट पॉवरमध्ये होत असतो. चीनबरोबर उभे रहायचे म्हणजे फक्त लोकसंख्या वाढवणे आणि युद्धसामुग्री तयार ठेवणे एवढ्यात ते भागत नाही. अमेरिकेबरोबर उभं रहायचं तर फक्त सॉफ्टवेअर इंडस्ट्रीतील तज्ज्ञ लोक तयार करून तिकडे पाठविणे एवढा एकच मार्ग नसतो. आपल्याला चीनप्रमाणे ऑलिम्पिक पदके जिंकावी लागतील, अमेरिकेच्या तोडीस तोड नोबेल्स जिंकावे लागतील, जपानप्रमाणे आर्थिक महासत्ता बनावे लागेल, नॉर्वे-स्पेनप्रमाणे भ्रष्टाचारमुक्त व्यवस्था विकसित करावी लागेल, इस्राईलप्रमाणे कृषिविकास साधावा लागेल, शेजारच्या श्रीलंकेप्रमाणे आरोग्य व्यवस्था सुधारावी लागेल...तेव्हा कुठे आपण एक-एक पाऊल पुढे जाऊ शकू...फ़िलहाल अभी तो दिल्ली बहोत दूर है!
ओह्हो...मी पोहोचलो की माझ्या कर्करोग रुग्णालयापर्यंत. एकूण २६ पायऱ्या चढून वरती गेलो की अगदी उजव्या हाताला लागतो तो माझा वॉर्ड नंबर १. बालकर्करोगाचे रुग्ण इथेच अॅडमिट केले जातात. आम्ही इथे त्यांच्यावर उपचार करतो...आणि हो, त्यांच्या जातिधर्माकडे न पाहता एक रुग्ण एवढाच आम्ही त्यांचा विचार करतो...ते बरे होऊन या स्वतंत्र भारताचे जबाबदार नागरिक व्हावेत एवढ्याच एका छोट्या अपेक्षेनिशी!
माझं विचारचक्र आत्तापुरतं पूर्ण झालंय...आगामी लेखांसाठी बरेच विषय मिळालेत मला; पण ती मोठी गोष्ट नाहीये. बरंच लिहिलंय का आज मी? लेख होण्याएवढं मोठ्ठं?!
मी थांबतोय आता. माणसाच्या मनात दिवसाकाठी हजारो विचार येऊन जातात...कशाकशावर लिहायचं? लेखासाठी विषय सुचणं अवघड नसतं, पण ते मांडता यायला हवं...विचारांवर संस्कार करता यायला हवेत! मी प्रयत्न करतोय...
...पण, मी अस्वस्थ आहे..!
एप्रिल २०१८ मध्ये मला एम. डी. ला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाला. पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणाच्या पहिल्या वर्षात जेवायला आणि अंघोळीलाही वेळ मिळत नाही इतके आम्ही व्यस्त असतो हे बऱ्याच जणांना माहिती असेलही! त्यामुळे इथे आल्यावर पुढील तीन वर्षांपैकी किमान दीड वर्षे तरी मला काही लिहायला वेळ मिळणार नाही हे मला माहिती होते. झालेही तसेच. मी काहीच लिहू शकलो नाही. पण, बऱ्याच जणांचे मला मेसेज येऊ लागले की, ‛सर, बरेच दिवस झाले, तुमचे नवीन लेख काही वाचायला मिळालेले नाहीत. काहीतरी लिहा.’ माझ्याही मनात तीव्र इच्छा होती; पण लेखाचा विषय काय असावा हा विचार करण्याइतपतही वेळ मिळत नव्हता.
दिवस असेच जात असताना परत एकदा दैवाने माझ्या बाजूने फासे टाकले. माझे पोस्टिंग किमान एक महिन्यासाठी शासकीय कर्करोग रुग्णालयात लावण्यात आले. इथे वैद्यकीय महाविद्यालयापेक्षा त्यामानाने कामाचा ताण थोडासा कमी असतो. इथे असताना स्वतःसाठी किमान अर्धा तास काढता येतो हे विशेष! (युनिट वाढत जाईल तसतशी पुढच्या एखाद्या महिन्यात इथेही मोठी गर्दी होणार आहेच!).तर...या रुग्णालयात विशेष नियुक्ती होणारे आम्ही (मी आणि माझे सहकारी) पहिलेच रेसिडेंट डॉक्टर्स! तसा आनंदाचा क्षण, पण धाकधुकीचाही. कर्करोग झालेली लहान मुले रोज पाहणे, तपासणे आणि त्यांच्यावर औषधोपचार करणे हे नेमून दिलेले काम...पण, त्या निरागस फुलांकडे मन घट्ट करून पाहणे आणि त्यांच्या आई-वडिलांच्या भावविश्वाचा नकळत कानोसा घेऊनही आपल्या वेदनादायी भावना दाबून ठेवाव्या लागणे हे अभावितपणे लागलेले ओझे काम!
![]() |
रक्ताचा कर्करोग झालेला माझा एक रुग्ण...चार महिन्यांत पहिल्यांदाच हसला |
सगळे अतिशय गरीब घरातून आलेले रुग्ण, आर्थिकदृष्ट्या अतिदुर्बल आणि त्यात आजार त्यामुळे घराचे कंबरडे मोडलेले, मुलं आजारी म्हणून आईवडिलही व्यथित, मागे घराकडे बघायला कोणी नाही अशी सर्वांची अवस्था! प्रत्येक पेशंटची दर्दभरी व्यथा...तसे एखाद्या ब्लॉगसाठी चांगले विषय आहेत हे. डोळ्यांतल्या अश्रूंची किंमत फार. हे विषय वेगळ्या दृष्टिकोनातून परत कधीतरी मांडेन मी; पण सध्या कशावर लिहू?
![]() |
शासकीय कर्करोग रुग्णालय, औरंगाबाद |
मी राहतो त्या शहरातील अस्वच्छता, जागोजागी पसरलेले माशांचे साम्राज्य, त्यामुळे उद्भवू पाहणारी सार्वत्रिक अनारोग्याची अवस्था आणि त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर- विशेषतः शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांवर- येणारा कामाचा अतिताण हा विषय चालेल का? मग, आपल्या ‛देशाच्या एकूण आर्थिक उत्पन्नापैकी (जीडीपी) आरोग्य सेवेवर खर्च केला जाणारा निधी आणि प्रगत-अतिप्रगत देशांतील अर्थव्यवस्थांत आरोग्य सेवेवर खर्च केलेला निधी’ यांच्यातील तौलनिक अभ्यासाबाबत मी खोलात शिरून एखादा अर्थपूर्ण लेख लिहू का? काय करू? मनाचे विचार माझ्या शहरातून मला थेट जीनिव्हातल्या जागतिक आरोग्य संघटनेच्या महासचिवांच्या कार्यालयात घेऊन गेले. पण हो, मी लिहू शकतो ना याही विषयावर. मला आवडच आहे की ‛आंतरराष्ट्रीय राजकारण आणि परस्परसंबंध’ या विषयाची! मागे नाही का मी ‛ब्रेक्झिट’वर एक लेख लिहिला होता आणि एम. पी. एस. सी. करणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्याच्या प्रिंट्स काढून घेतल्या होत्या! तेव्हा मी तो लेख कॉपीराईट केला होता, पण त्याच्यावर माझा लोगो टाकायचा राहून गेला होता. पुण्यात होतो त्यावेळी मी संतोषबरोबर. संतोष, माझा चुलतभाऊ. तो मला म्हणाला होता, ‛दादा, तू कॅमस्कॅनर डाउनलोड कर. त्याच्यावर फोटो काढ आणि मग ब्लॉग अपलोड कर. मग मुलांनी प्रिंट्स काढल्या तरी तुझं नाव आणि लोगो त्यावर येईलच.’ तेव्हा मी तानाजीच्या (दुसरा चुलतभाऊ) खोलीवरून निघून स्वारगेटकडे जात होतो. आदल्या रात्रीच मी भाताण्यावरून (पालघर जिल्ह्यातील आदिवासी भागातील माझे नोकरीचे ठिकाण असलेले गाव) निघून पुण्याला आलो होतो. किती जिकिरीचा प्रवास तो. आधी ३ किमी चालत पायी प्रवास करायचा, मग ६ किमी टमटमने, मग ६ किमी एस. टी. ने, मग ११ किमी सिटी बसने वसई स्टँड गाठायचे. दुपारनंतर केवळ चार वाजताचीच एक बस असायची. मग गडबडीत ती पकडायची आणि घामेजलेला रटाळ ६-७ तासांचा पुण्यापर्यंतचा प्रवास करायचा. “बापरे! मला इतका त्रास व्हायचा!” मे, २०१४ मध्ये भाताणे प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी गट ‛अ’ या राजपत्रित पदावर मी रुजू झालो. अतिशय दुर्गम भागातले ते गाव. यायला-जायला रस्ता नाही. गावात काही व्यवस्था नाही. जवळचे हॉटेल २५ किमीवर. चहा प्यायचा तरी तीन अधिक तीन (येण्याचे-जाण्याचे) अशी सहा किमीची पायपीट. पावसाळ्यात प्राथमिक आरोग्य केंद्र पाण्याखाली जायचे आणि अत्यावश्यक सेवा असल्यामुळे ‛कसल्याही परिस्थितीत वैद्यकीय अधिकारी आणि ड्यूटीवरील कार्यरत स्टाफने मुख्यालय सोडू नये’ असे शासनाचे आदेश.
![]() |
पालघर जिल्ह्यातील या आदिवासी प्राथमिक आरोग्य केंद्रात मी साडेतीन वर्षे कार्यरत होतो |
दवाखान्यात, प्रसूतिकक्षात, ओपीडीत, रुमवर एखाद्या दिवशी साप-विंचू दिसले नाहीत तर करमू नये इतकी त्यांची सवय. येणारे रुग्ण पैशांअभावी स्वतःची हेळसांड करणारे आणि त्यामुळेच आजाराच्या शेवटच्या टप्प्यात किंवा अत्यवस्थ स्थितीत येणारे. पहिल्यांदा खूप धावपळ व्हायची...खरं सांगू का, त्यांचा राग यायचा. ‛इतके दिवस घरी काय करत होता?’ असं मी विचारायचो. नंतर नंतर त्यांच्या व्यथा समजू लागल्या. वेळ जाईल तसतसा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आधी सहानुभूतीने आणि नंतर रागाने घेतला...राग त्यांच्यावरचा नव्हे, तर आपल्यावरचा-आपल्या व्यवस्थेवरचा! असो. भाताणे गावातून तानसा नावाची नदी वाहते. (तानसा धरणातून मुंबईला पाणीपुरवठा होतो. वस्तुस्थिती अशी की, त्या धरणाचे पाणी मायानगरी मुंबईची तहान जरी भागवत असले तरी, या धरणाच्या भिंतीला लागून असलेल्या गावातील लोकांना तोंड भिजवण्याइतकेही पाणी त्या धरणातून मिळत नाही. माझे पहिल्यांदा पोस्टिंग झाले ते गगनबावडा ग्रामीण रुग्णालयात; तिथलीही परिस्थिती अशीच. गगनबावडा हे महाराष्ट्राचे चेरापुंजी- सर्वाधिक पावसाचे ठिकाण. तिथे मी संपूर्ण एक वर्ष होतो. पावसाळ्यात सलग चार महिने पाऊस न उघडणाऱ्या या गावात डिसेंबर महिन्यापासूनच पोरीबाळींना डोक्यावर घागरी-हंडे घेऊन पाण्यासाठी वणवण भटकावे लागते.) पावसाळ्यात पहिल्याच मोठ्या पावसात तानसा नदीला पूर येऊन गावचा रस्ता बंद पडायचा आणि मग आम्हाला गावाबाहेर संपर्क ठेवण्यासाठी दोन तीन गावांना कच्च्या रस्त्याने वळसा घालून बाहेर पडावे लागायचे. ‛गावातून चांदिपपर्यंत मधल्या रस्त्याने थेट पूल होणार आहे’ हे मी तिथे असलेल्या जवळपास प्रत्येक वर्षी नव्याने ऐकले आहे; पण मी तिथे असेपर्यंत तरी पूल काही झाला नाही. आणि, गावातून मोठ्या रस्त्याला जोडणारा जो मुख्य रस्ता होता, तो एकतर आधीच खचला होता आणि पावसाळ्यात तर बरेच दिवस तो पाण्याखाली असायचा. पावसाळ्यातील अशा दिवसांत एखाद्या गंभीर अवस्थेतील रुग्णाला संदर्भसेवा देणे अत्यंत जिकिरीचे ठरत असे (अजूनही ठरते). दोन-तीन वेळा तर मीच रुग्णाला दुचाकीवर बसवून रस्त्यापलीकडे उभ्या राहणाऱ्या १०८ च्या रुग्णवाहिकेत नेऊन बसवलेलं मला स्पष्ट आठवतंय. गरिबांना खरंच कुणी वाली नसतो का? गरिबांच्या अंगावर कपडे नाहीत म्हणून स्वतः वस्त्रत्याग करणारे ‛गांधी’ आणि “ मोहिमेच्या वेळी गोरगरीब रयतेने पिकवलेल्या धान्याच्या एका कणसालाही धक्का लावू नका’’ असा जरबेचा दम भरणारे छत्रपती शिवाजी महाराज या दोघांचीही आज देशाला गरज असताना ते कुठे हरवले आहेत? त्यांना कसं शोधायचं बरं? आणि, समजा ते सापडलेच तर मग नवीन पिढीत गांधी आणि छत्रपती शिवाजी महाराज निर्माण न झाल्याबद्दल ते स्वतःलाच दोष देतील का?
अरे वा! महाराजांच्या स्वराज्यात आपण जन्माला आलो हे महद्भाग्यच की! मी गेल्या दोन वर्षभरात ४४ गड फिरलो. महाराष्ट्राचे सर्वोच्च शिखर असलेल्या कळसुबाईपासून ते अत्यंत कमी उंची असलेल्या बल्लाळगडापर्यंत. आपले (माणसाचे) क्षुद्र अस्तित्व ठळकपणे अधोरेखित करणारे हरिश्चंद्रगडाचा कोकणकडा, विशाळगडावरचे पठार, मलंगगडाची उंची आणि रांगण्याची भव्यता; उन्हाळ्यातही रंगीबेरंगी शीतलतेचा अनुभव देणारे टकमकगड आणि कलानिधीगड; तत्कालीन समाजातील स्त्रियांवर केल्या जाणाऱ्या अन्यायाची आठवण करून देणाऱ्या सतीशिळारुपी स्मारकांना आजही अंगाखांद्यावर वागवणारे पारगड, शिवगड, वसंतगड, विशाळगड; शिवकालीन लोकांमध्ये स्वच्छतेबाबत असणाऱ्या जागरुकतेचे आणि स्वच्छताशास्त्राचे महत्त्व अधोरेखित करून दाखवणारे भुदरगड, वसंतगड; युद्ध आणि शत्रूपासून बचाव व्हावा म्हणून अद्भुत रचना करून बांधलेले रांगणा आणि पन्हाळगड; शिवशंभूच्या पदस्पर्शाने पावन झालेला पन्हाळा; शिवाजी महाराज ज्या किल्ल्यांच्या वास्तुशांतीला स्वतः जातीने उपस्थित राहिले असे कलानिधीगड, महिपाळगड, पारगड आणि गंधर्वगड; समुद्राच्या भव्यतेलाही टक्कर देत उभे असलेले शिरगावचा किल्ला आणि केळवागड; अतिभव्य-अतिउंच विस्तीर्णतेचा कणखरपणा अंगी असूनही स्वतःच्या माथ्यावरील तलावात फुलवलेल्या कमळरुपी हळुवारपणाचा अनुभव देणारा अशेरीगड; एकाकीपणातही स्वतःचे एकमेवाद्वितीयत्व टिकवून ठेवणारा किल्ले कोहोज... चांगल्या सत्शील माणसाचा एक-एक स्वभावगुण अंगी बाणवलेले हे गडकोट आहेत की पूर्वस्मृती जपणारी खरीखुरी माणसंच आहेत ही? पुण्यवान माणसापेक्षाही पुण्यवान ते! का काय विचारताय? अरे छत्रपतींच्या पायांची धूळ आजही अंगाखांद्यावर मिरवण्याचं भाग्य जर कोणाच्या उरी दडले असेल तर ते हेच आपले गडकिल्ले नव्हेत का? बरं, हे गडकिल्ले केवळ शोभेसाठीचे नव्हते...
माझ्या राजाच्या स्वराज्याचं रक्षण करण्याचे मोठे काम त्यांनी ताठ मानेने केलेले आहे. कसा असेल तो काळ? त्याकाळातल्या स्वराज्यात पूर्वजन्मातला मी कोण असेन? राजांच्या जवळचा असेन की त्यांना मी माहितीही नसेन? काय केलं असेल मी स्वराज्यासाठी? कुठं राहत असेन? त्यावेळी मी होतो तरी का नक्की? आणि, असलोच तर महाराज बोलले असतील का कधी माझ्याशी? काय म्हणाले असतील? एखाद्या मोहिमेत त्यांनी मला सहभागी करून घेतले असेल का? काय कामगिरी दिली असेल मला? किती प्रश्न...उत्तरं मात्र कशाचीच नाहीत...कधीकधी प्रश्नांना उत्तरं न मिळणंच चांगलं ठरत असेल का? अडचणींच्या उत्तरांपेक्षा ते बरं, नाही का?
अरे हो...अडचणीचे प्रश्न तर बरेच आहेत; विचारही करायला नको असे वाटणारे- भ्रष्टाचारयुक्त भारतापासून ते आत्ता माझ्यासमोरून गेलेल्या आणि कुणीतरी पाठीत मारल्यामुळे मागचे दोन्ही पाय लुळे (काही विकसनशील देशांच्या अर्थव्यवस्थांप्रमाणे! वा, काय सुचलंय!) पडलेल्या कुत्र्याच्या hapless अवस्थेबद्दल... (बरं, hapless ला मराठीत तंतोतंत समानार्थी असणारा कोणता शब्द आहे? हा विचार जास्त नको, नाहीतर विषयांतराचेही विषयांतर व्हायचं!) भावनिक आणि मानवतेच्या दृष्टिकोनातून विचार करता कर्करोग रुग्णालयाच्या परिसरात फिरणारं ते कुत्र्याचं पिल्लू जगलं पाहिजे किंवा खरंतर जगवलं पाहिजे; पण व्यावहारिक विचार करता ते पिल्लू आता डार्विनच्या survival of the fittest या जगन्मान्य सूत्रात बसत नसल्यामुळे (आणि स्वतःच्या ताकदीवर दीर्घकाळ जिवंत राहणे त्याला शक्य नसल्यामुळे) त्याचा मृत्यू होणे हा नैसर्गिक मार्ग ठरावा.
![]() |
शासकीय कर्करोग रुग्णालयाच्या परिसरात फिरणारं आणि पाठीमागचे दोन्ही पाय अधू पडलेले ‘ते’ कुत्र्याचे पिल्लू! |
कित्ती सोपंय ना सगळं? मग एवढा सोपा असलेला हा नियम याच कर्करोग रुग्णालयात वरच्या मजल्यावर दीर्घकाळ उपचार घेणाऱ्या त्या तीन वर्षांच्या मुलीला आपण लावू शकतो का? तिला रक्ताचा कर्करोग झाला आहे आणि तो पुढच्या स्टेजला गेलेला कर्करोग आहे. या आजारामुळे तिच्या हाडांमधील रक्त तयार करणाऱ्या पेशी निकामी झाल्या आहेत. त्यामुळे जितके दिवस तिला रक्त चढवत राहणार तितकेच दिवस तिचे आयुष्य असणार आहे. आपण रक्त चढवायचे थांबवू त्याच्या दुसऱ्या दिवशी तिचा मृत्यू होणे अटळ आहे. मग तरीही आपण तिला जगवत राहतो...आणि, माणुसकी म्हणून ते आपले कर्तव्य समजतो. ते योग्यही आहे; पण मग त्या कुत्र्याच्या पिलाचं काय? त्याच्याकडेही माणुसकीने पाहण्याइतपत आपल्यातली माणुसकी कधी प्रगल्भ होणार?
माझ्या मनातलं विचारचक्र गरागरा फिरतंय. जाऊदे. कशाला स्वतःला इतका त्रास करून घ्यायचा? गेल्या तीन युगांप्रमाणे सध्याचे हे कलियुगही कधीतरी संपणारच आहे. असाच एखादा राम, कृष्ण, शिवाजी, गांधी येईल जन्माला आणि मग परत एकदा ‘नवयुगा’ला सुरुवात होईल. हरिश्चंद्रगडावरील ‘त्या’ गुहेतील शिवलिंगाभोवती चार युगांचे निदर्शक असे चार खांब आहेत, प्रत्येक संपणाऱ्या एकेका युगाबरोबर त्यातला एकेक खांब तुटून पडतो...आता शेवटचा एकच खांब राहिलाय, तो आहे कलियुगाचा निदर्शक. तो तुटेल त्यादिवशी कलियुग संपेल अशी आख्यायिका आहे.
![]() |
हरिश्चंद्रगडावरील ‘ते’ शिवलिंग...सध्या शाबूत असलेला चौथा खांब पडेल तेव्हा कलियुग संपेल अशी आख्यायिका आहे! |
काय चाललंय आज माझं? हं, माझी आजची ओपीडी संपली आहे. आज खूप पेशंट्स आले... अगदी नेहमीप्रमाणेच...लोकसंख्याच तेवढी आहे देशाची, तर यापेक्षा वेगळं काय होणार मग? कशात नसेल, पण माणसांच्या संख्येत तरी आम्ही जगात भारी आहोत. याचा गर्व करावा की खेद? लोकसंख्या नियंत्रणासाठी राष्ट्रीय कार्यक्रम राबवणारा भारत जगातील पहिला देश आणि तोच देश जगातील सर्वाधिक लोकसंख्या असणाराही देश! किती विरोधाभास! यासाठी आपण आपले कौतुक करावे की लाज वाटून घ्यावी? काहीजण देशाला ‘सर्वाधिक युवाओं का देश’ म्हणवून वैचारिक सकारात्मकता दाखवतात (की, सकारात्मकतेचा आव आणतात?!). पण, ते ही गोष्ट लक्षात घेत नाहीत की, बरोबर ४० वर्षांनी हाच देश ‘वृद्धांची सर्वाधिक संख्या’ आणि म्हणून समस्या असणारा देश ठरणार आहे. (वृद्ध लोक ही इथे समस्या नाही. देशातील लोकसंख्येतील अनुत्पादक लोकसंख्येचे एकूण लोकसंख्येशी असणारे प्रमाण वाढणे ही समस्या असते.) बरं, संततिप्रतिबंधक कायदा म्हटला की सर्वांना न चुकता संजय गांधी आठवतात. (तसेही कोणत्यातरी गांधींची आठवण न काढता आपल्या देशात बहुधा कुणाचाच दिवस जात नसावा!!!) पण, संततिनियमनाच्या कायद्याला किंवा साधनांना पहिला विरोध स्वतंत्र भारताच्या पहिल्या केंद्रीय आरोग्यमंत्री अॅनी बेझंट यांनीच केला होता हे कुणाच्या गावीही नसते. असो. आता मी लोकसंख्येवर कसा काय घसरलो मध्येच?
अरे बापरे! कशाकशाचा आणि किती म्हणून विचार करायचा? आणि, का करायचा? मी निघालोय औरंगाबादेतील प्रसिद्ध अशा ‘बरकत’ की स्टॉलवरचा चहा प्यायला.
![]() |
बरकत टी हाऊस |
आम्हाला आमच्या रक्ताचा फक्त लाल रंगच माहिती आहे...बाकी, प्रश्न राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय होईपर्यंत त्या रक्ताच्या भगव्या, हिरव्या, निळ्या रंगांचा विचारही मनाला शिवत नाही. भारताच्या फाळणीला गांधी जबाबदार होते आणि त्यांनी मुस्लिमांचे लांगुलचालन केले असा तथ्यहीन प्रचार करणारे लोक आज मोठ्या संख्येने आढळतात. स्वतःचे वाचन आणि अभ्यास नसल्यामुळे म्हणा किंवा काही वेगळ्या विचारांचा प्रभाव असल्यामुळे म्हणा, आज जगाला वंदनीय असणारे गांधी आपल्याच देशात केवळ नोटांवरच्या फोटोंपुरते मर्यादित झाले आहेत. राष्ट्रपुरुष ठरलेले लोक आपल्या देशात विशिष्ट समुहांपुरते मर्यादित केले गेल्याचे चित्र हतबलतेने आपणास पहावे लागत आहे. याच मानसिकतेतून गांधी-नेहरू काँग्रेसपुरते, बाबासाहेब दलितांपुरते, छत्रपती शिवाजी-संभाजी महाराज मराठ्यांपुरते, सावरकर हिंदुत्ववाद्यांपुरते संकुचित करून ठेवल्याचे पाप आपल्या भाळी आपण लावून घेतले आहे. आता त्याच गाडीवरून मी माझ्या रुग्णालयाकडे परततोय. निदान आपली रुग्णालये तरी आजही जात-धर्मनिरपेक्ष काम करताहेत हेही नसे थोडके! भारतासारख्या खंडप्राय देशाचे ऐक्य आता इतके आजारी पडले आहे की, केवळ रुग्णालये हीच शब्दशः त्याच्या उपचाराचे एकमेव ठिकाण होऊन बसले आहे.
मी आता परत निघालोय. अरेरे, मला समोर काय दिसतंय हे? कचऱ्याचे मोठाले ढीग! अहो, ते आश्चर्यजनक नाहीये माझ्यासाठी.
![]() |
संग्रहित छायाचित्र |
त्या ढिगाजवळची ती दोन माणसे. त्यांनी माझ्या डोक्यात मुंग्या आणल्या. ती दोन माणसं- पुरूष. एक साधारण विशीतला, दुसरा चाळिशीतला. काय करत होते ते दोघे? तर कचऱ्यातून शोधून शोधून लोकांनी कधीतरी टाकून दिलेले काही पदार्थ ते बाहेर काढत होते. आणि, मग त्याच ढिगाच्या काठावर बसून ते ते खात होते. किती हा दैवदुर्विलास! गरजेपेक्षा जास्त झाले आहेत म्हणून आपण थेट कचऱ्यात टाकून दिलेले अन्नपदार्थ. अन्न तेच, पण थोडक्याच वेळात किती संदर्भ बदलले!! पोटाच्या वर बांधता येत नाहीत म्हणून टाकलेले तेच अन्न पोटात ढकलायलाही काहीच नाही म्हणून वापरले जात होते. पूर्वी कधीतरी अन्नसुरक्षा वगैरे शब्द ऐकल्याचे, त्याबद्दल काहीतरी वाचल्याचे संदर्भ आठवले. कोठे गेली अन्नसुरक्षा? शासकीय गोदामात सडणाऱ्या हजारो क्विंटल धान्याचे काय? असे किती लोक अक्षरशः इतरांनी फेकलेल्या तुकड्यांवर जगताहेत? २५ तारखेला माझा वाढदिवस झाला. नवीन झालेल्या मित्रांनी तो साजरा करण्याचा आग्रह धरला आणि त्यांनीच केकही आणला. केक कापल्यावर त्यातल्या काहीजणांनी तो माझ्या चेहऱ्यावर लावण्याचा प्रयत्न केला. मी त्याला स्पष्ट शब्दांत नकार दिला. आणखीन दोघांनी माझा विचार उचलून धरला. “खायचा पदार्थ आणि अंगाला लावायची वस्तू” यांतला फरक न कळण्याइतपत आपले मानसिक आणि सामाजिकही अधःपतन झालंय का? कचऱ्याच्या ढिगाऱ्यावरचे अन्न खाणारे ते दोघे पाहिल्यावर माझ्या वाढदिवसादिवशी मी माझ्या विचारांवर ठाम राहिल्याबद्दल माझाच मला अभिमान वाटू लागलाय. २१ व्या शतकात महासत्ता बनण्याची स्वप्ने पाहणारे आपण (काहीजणांनी तर भारत महासत्ता बनली असल्याचे जाहिरही केलंय!) सत्यापासून अजून किती दूर आहोत हे पाहण्याची गरज आहे. देशातील जनतेचे दारिद्र्य पाहून स्वतःच्या अंगावरील वस्त्रांचा त्याग करणारा महात्मा याच देशात जन्माला आला होता हे वैशिष्ट्य! आणि, आता परत गांधीजी भारतातच जन्माला आले तर त्यांना आणखी एकदा वस्त्रत्याग करून फकिरी करायला लावण्याइतपत गेल्या ७० वर्षांत आपण केलेली प्रगती...खरंच खंत वाटण्याजोगी परिस्थिती! स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतरही अन्न, वस्त्र, निवारा याच आपल्या जनतेच्या मूळ गरजा राहणे हे महासत्ता बनू पाहणाऱ्या देशाचे निश्चितच वैशिष्ट्य असू शकत नाही. आजही आपण रस्ता, पाणी आणि वीज या मुद्द्यांशिवाय निवडणुका लढवू शकत नाही हे सत्य!
महासत्ता बनण्यासाठी मोठी सैन्यदले, लढाऊ विमाने, युद्धनौका, रणगाडे आवश्यक आहेतच. कैक दशकांतून कधीतरी एखाद्या वेळेस होणाऱ्या युद्धासाठी आपण इतकी तयारी करतो, पण अगदी रस्त्यांपासून ते सरकारी कार्यालयांपर्यंत आणि पाण्यापासून (खरेतर, शुद्ध हवेपासूनच लढाईची सुरूवात होते. आठवा, दिल्लीतील प्रदूषण!) ते पोटभर अन्नापर्यंत क्षणोक्षणी आणि पदोपदी जनतेला लढाव्या लागणाऱ्या लढाईचं काय? त्यातून आपण कधी मुक्त होणार? दक्षिण मुंबईत राहणाऱ्या ‘भारतीय’ नागरिकांना आपल्या भागाबाहेरही आपला देश आहे आणि तिथे आपलेच भारतीय बंधू-भगिनी राहतात याची कल्पनाच नाही. त्यांना अजूनही इंग्रजांची राजवटच भारतावर हवी होती असे वाटते, इतकेच ते भारतीय आहेत. भारतीयत्वाची आन-बाण आणि शान असणारा तिरंगा स्वातंत्र्यदिनी सामूहिक राष्ट्रगीत गायनासह आपल्यापासून केवळ ५० फुटांवर फडकावला जात असताना, आपल्या आयुष्यातील केवळ ५२ सेकंदही न देऊन त्याचा सरळसरळ अपमान करणारे दक्षिण मुंबईकर मी बऱ्याचदा पाहिले आहेत...त्यांनाही आपण आपले भारतीय बांधव मानतो हा आपला मोठेपणाच...बाकी, आधार, पॅनकार्ड आणि पासपोर्ट ही कागदपत्रे आणि त्यांचा व्यवसाया यांशिवाय त्यांचा त्यांच्या आयुष्यात भारताशी साधारणतः काही संबंध येत असावा असे मला प्रामाणिकपणे वाटत नाही. महासत्ता व्हायचं तर २१ व्या शतकात ‘हार्ड’ पॉवरबरोबर ‘सॉफ्ट पॉवर’ही विकसित करावी लागते. साहित्य, कला, क्रिडा, शास्त्रांचा अभ्यास यांचा समावेश सॉफ्ट पॉवरमध्ये होत असतो. चीनबरोबर उभे रहायचे म्हणजे फक्त लोकसंख्या वाढवणे आणि युद्धसामुग्री तयार ठेवणे एवढ्यात ते भागत नाही. अमेरिकेबरोबर उभं रहायचं तर फक्त सॉफ्टवेअर इंडस्ट्रीतील तज्ज्ञ लोक तयार करून तिकडे पाठविणे एवढा एकच मार्ग नसतो. आपल्याला चीनप्रमाणे ऑलिम्पिक पदके जिंकावी लागतील, अमेरिकेच्या तोडीस तोड नोबेल्स जिंकावे लागतील, जपानप्रमाणे आर्थिक महासत्ता बनावे लागेल, नॉर्वे-स्पेनप्रमाणे भ्रष्टाचारमुक्त व्यवस्था विकसित करावी लागेल, इस्राईलप्रमाणे कृषिविकास साधावा लागेल, शेजारच्या श्रीलंकेप्रमाणे आरोग्य व्यवस्था सुधारावी लागेल...तेव्हा कुठे आपण एक-एक पाऊल पुढे जाऊ शकू...फ़िलहाल अभी तो दिल्ली बहोत दूर है!
ओह्हो...मी पोहोचलो की माझ्या कर्करोग रुग्णालयापर्यंत. एकूण २६ पायऱ्या चढून वरती गेलो की अगदी उजव्या हाताला लागतो तो माझा वॉर्ड नंबर १. बालकर्करोगाचे रुग्ण इथेच अॅडमिट केले जातात. आम्ही इथे त्यांच्यावर उपचार करतो...आणि हो, त्यांच्या जातिधर्माकडे न पाहता एक रुग्ण एवढाच आम्ही त्यांचा विचार करतो...ते बरे होऊन या स्वतंत्र भारताचे जबाबदार नागरिक व्हावेत एवढ्याच एका छोट्या अपेक्षेनिशी!
माझं विचारचक्र आत्तापुरतं पूर्ण झालंय...आगामी लेखांसाठी बरेच विषय मिळालेत मला; पण ती मोठी गोष्ट नाहीये. बरंच लिहिलंय का आज मी? लेख होण्याएवढं मोठ्ठं?!
मी थांबतोय आता. माणसाच्या मनात दिवसाकाठी हजारो विचार येऊन जातात...कशाकशावर लिहायचं? लेखासाठी विषय सुचणं अवघड नसतं, पण ते मांडता यायला हवं...विचारांवर संस्कार करता यायला हवेत! मी प्रयत्न करतोय...
...पण, मी अस्वस्थ आहे..!
निशब्द 😷😷😷😷😷
ReplyDeleteधन्यवाद...
Deletesir kalyug lavakarch sampu de......
ReplyDeleteblog 1 no.
खूप खूप आभार
DeleteNice
ReplyDeleteThanks a lot
Deleteऔरंगाबाद वद्दल जे काही लिहिलय...सम्पूर्ण सहमत.
ReplyDeleteOk ... Thanks
Deleteअमित कशावरती लिहु म्हणता म्हणता प्रत्येक विषयाला अगदी थोडक्यात पण अगदी अचूक, गंभीरपणे विचार करायला लावणारा लेख आहे आणि आत्तापर्यंतचा सर्वात प्रगल्भ लेख.
ReplyDeleteधन्यवाद संतोष. तुझी प्रतिक्रिया अतिशय प्रेरणादायी आहे.
Deleteशब्द अपूरे आहेत माझ्याकडे अमित
ReplyDeleteखरच अप्रतीम
आणि माझ्या माहीतीनूसार राहूल काय मोदीला पन वैचारीक टक्कर देन्याचे सामर्थ आहे तुझ्यात
ReplyDeleteKharach great
धन्यवाद
Deleteआभारी आहे
ReplyDeleteहा लेख जबरदस्त आणि वेगळ्याच धाटणी चा मला खुप आवडला,मांडणी खुप छान केली आहेस ,काय लिहू म्हणत किती लिहला आहेस आणि ते ही उत्तम रीतीने. 👌👌👌
ReplyDeleteसर खूप छान....जणू शब्दांनी स्वता:हून बहाल केले आहे तूम्हाला...
ReplyDelete